चेन्नई-कोलकात्यापेक्षाही मुंबईत जास्त प्रदूषण

मुंबई (प्रतिनिधी): मुंबईतील वातावरण दिवसेंदिवस अधिकच प्रदूषित होत आहे. 'सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अॅड क्लीन एअर' या नामांकित संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मुंबई शहरातील हवेतील पीएम२.५ या विषारी कणांचे सरासरी प्रमाण राष्ट्रीय मानकपिक्षा कमी आहे. मुंबईतील सायन आणि देवनार भागातील हवा चेन्नई-कोलकात्यापेक्षाही जास्त प्रदूषित आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

या अहवालातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे देवनार, सायन, कांदिवली पूर्व आणि बीकेसी यांसारख्या मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये प्रदूषणाची पातळी ही प्रमाणापेक्षा जास्त वाढली आहे. ही प्रदूषणाची पातळी चेन्नई, कोलकाता, पहुंचेरी आणि विजयवाडा यांसारख्या इतर किनारपट्टीच्या शहरपिंक्षाही अधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरात असे उच्च प्रदूषित क्षेत्र असणे हे धोक्याचे संकत आहेत.

देशातील २३९ शहरांतील हवेच्या गुणवत्तेवर आधारित हा सविस्तर अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, मुंबईतील देवनार हे किनारपट्टीवरील सर्वात प्रदूषित ठिकाणांपैकी एक आहे. केवळ देवनारच नाही, तर मुंबईतील इतर काही भागांमध्येही पीएम २.५ ची पातळी ४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर या राष्ट्रीय मर्यदिपेक्षा अधिक आढळली आहे.

तातडीच्या उपाययोजनांची नितांत गरज


मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरातही अशा उच्च प्रदूषणाची नोंद होत असल्याने, स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजनाची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाहनांचे वाढते उत्सर्जन, बांधकाम प्रकल्प आणि कचरा जाळणे ही प्रदूषणाची प्रमुख कारणे मानली जातात. मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये वाढलेले प्रदूषण लक्षात घेता, महानगरपालिका आणि राज्य प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, जेणेकरून मुंबईकरांना शुद्ध हवा मिळू शकेल.
Comments
Add Comment

Dr. Neelam Gorhe : राज्यातील अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यथित

थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर प्रकरणांत कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक न्यायालयीन सुनावणी आणि पीडित

SSC Result : कधी आहे दहावीचा निकाल ? आली मोठी अपडेट

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल

Mumbai Water Metro : मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक गरजांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर वादाळात अडकले आणि...

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असताना

Mumbai Water Metro : मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेच्या मे. हायके एएस यांच्यात सामंजस्य करार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील

Chandrakant Patil : पदे बोगस, पदव्याही बोगस; वांद्रेतील 'हिरे' महाविद्यालयात १३२ विद्यार्थ्यांना गंडा, मंत्री चंद्रकांत पाटलांचे फौजदारी कारवाईचे आदेश

मुंबई : वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालयात १३२ हून अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या