समुद्रकिनारी तेलाचे तवंग; परिसरात जाण्यास मनाई

मुरुड : गेल्या दोन दिवसांपासून काशिद बीच समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर तेलाचे तवंग आल्याचे दिसून येत आहे, पावसाळ्यात येथील समुद्र किनारा पर्यटनात बंद असून पावसाळ्यामुळे समुद्र पोहण्यासाठी धोकादायक असून समुद्र किनारी परिसरात जाण्यास व समुद्रात पोहण्यास सक्त मनाई असल्याचे फलक ग्रामपंचायतीतर्फे लावण्यात आले आहेत.


उधाणाच्या भरतीने समुद्रकिनाऱ्यावर गेल्या दोन दिवसांपासून तेल (ऑइल)वाहून आले असून ऑईलचे धब्बे किनाऱ्यावर दूर पसरलेले दिसून येत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर एक प्रकारची काळी झालर आणि तेलाचा वास सुटलेला आहे. किनाऱ्यावर ऑईलचे गोळे पसरून किनारा विद्रुप झाला आहे. समुद्र पोटात काहीच ठेवत नाही. समुद्राला भरती आली की हेच ऑइलजवळील समुद्रकिनारी गोळ्यांच्या रूपाने किनाऱ्यावर पसरून किनारा विद्रुप झाला असल्याचे दिसून येते आहे.पावसाळ्यात दोन महिने येथील विविध स्टॉल बंद ठेवण्यात आले आहेत. पावसाळ्यात पोहोण्यापासून धोका लक्षात घेऊन याठिकाणी पोलीस, सुरक्षा रक्षक तैनात असून, संरक्षक जाळ्या बसविल्या आहेत.पावसाळ्यामुळे समुद्र पोहण्यासाठी धोकादायक असून समुद्र किनारी परिसरात जाण्यास व समुद्रात पोहण्यास सक्त मनाई असल्याचे फलक ग्रामपंचायतीतर्फे लावण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.