मनपा निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा - अजित पवार

पुणे : येत्या काळात महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाला लागा, निवडणुकीचा जो निर्णय होईल तो होईल, आपण आपली प्रत्येक प्रभागात तयारी करा, अशा सूचना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख नेेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.


मुंबई, पुण्यासह 35 महापालिकांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. यासाठी महायुती व महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व नेते मंडळींची पुण्यात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


पुण्यात आपल्याकडे संख्याबळ चांगले आहे, प्रत्येक प्रभागापर्यंत पक्ष पोहोचवा सदस्य नोंदणी करा, मी स्वतः पुण्यात पक्षात लक्ष घालेन, ऑगस्ट महिन्यात मी सगळा आढावा घेणार आहे. दुसरीकडे त्यांनी नवीन शहराध्यक्षांना येत्या काळात शहरातील कार्यकारिणी तयार करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे