मनपा निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा - अजित पवार

पुणे : येत्या काळात महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाला लागा, निवडणुकीचा जो निर्णय होईल तो होईल, आपण आपली प्रत्येक प्रभागात तयारी करा, अशा सूचना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख नेेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.


मुंबई, पुण्यासह 35 महापालिकांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. यासाठी महायुती व महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व नेते मंडळींची पुण्यात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


पुण्यात आपल्याकडे संख्याबळ चांगले आहे, प्रत्येक प्रभागापर्यंत पक्ष पोहोचवा सदस्य नोंदणी करा, मी स्वतः पुण्यात पक्षात लक्ष घालेन, ऑगस्ट महिन्यात मी सगळा आढावा घेणार आहे. दुसरीकडे त्यांनी नवीन शहराध्यक्षांना येत्या काळात शहरातील कार्यकारिणी तयार करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात