राज्यात वातावरणात अस्थिरता, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात हवामानात यंदा मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत असून पूर्वमोसमीपासून ते सध्याच्या मोसमी पावसापर्यंत वातावरणात अस्थिरता जाणवतं आहे. यामुळे पावसाचा अचूक अंदाज बांधणे हवामान खात्यासाठीही कठीण ठरत आहे. अशा पार्श्वभूमीवर मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने पुन्हा जोर धरला असून मुंबई, ठाणेसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.


विशेषतः विदर्भ, नागपूर, नाशिक या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून तयार झालेले चक्रीवादळ झारखंड आणि छत्तीसगडमार्गे महाराष्ट्रात पोहोचले असून त्याचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला बसला आहे. यासोबतच अरबी समुद्रातून सुमारे ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्यामुळे राज्यात हवामानात झपाट्याने बदल होत आहेत.



हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार


१३ जुलै रोजी : रत्नागिरी, सातारा, नाशिक घाट प्रदेश, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, नगर, पालघर, संभाजीनगर, जालना आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.


१४ जुलै रोजी : तळकोकणासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथा असलेले पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्हे यलो अलर्टच्या प्रभावाखाली राहतील.


राज्यातील पावसाचा जोर येत्या १५ जुलैपर्यंत कायम राहणार असून सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात पावसाचे प्रमाण तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे.


तथापि, कोकण आणि मराठवाडा विभागात जोरदार पावसाचा इशारा कायम आहे, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाच्या चार आठवड्यांच्या विस्तृत अंदाजानुसार, जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातही पावसाचे प्रमाण समाधानकारक राहणार असून ७ ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत सामान्य पावसाची स्थिती राहणार आहे.


दरम्यान, २२ जुलैपर्यंत पावसामध्ये खंड येण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यानंतर वातावरण अनुकूल झाल्यास पुन्हा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता आहे.बदलत्या हवामानानुसार परिस्थितीत बदल होऊ शकतो.

Comments
Add Comment

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तिघांना अटक, परीक्षा पुढे ढकलल्याने लाखो उमेदवारांमध्ये संताप

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ च्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयावरून राज्यभरात खळबळ उडाली असून या

Ketan Agrawal Murder Case : क्रिकेटचं मैदान ते हत्येचा कट; २००० कॉल्स, २३८ तास संवाद अन् सिया-चेतनच्या अफेअरची 'इनसाईड स्टोरी' उघड!

पुणे : पुण्याजवळील लोहगड किल्ल्याच्या भयावह दरीत केतन अग्रवाल (Ketan Agrawal) या तरुणाला ढकलून दिलेल्या प्रकरणाचा तपास

BMC Schools : जेम पोर्टलमुळे शालेय वस्तू खरेदीला विलंब नाही, महापालिका प्रशासनाने केली भूमिका स्पष्ट

वह्या, पुस्तकांच्या वजनानुसार मुलांना दप्तरे द्या तब्बल दोन वर्षांतील ४३ कोटी रुपयांची झाली बचत मुंबई : मुंबई

BMC : इतर प्राधिकरणांच्याा जमिनीवर विकासकामे करताना अडचणींचा डोंगर

अतिरिक्त आयुक्तांनी दिला समन्वय राखण्याचा सूचना मुंबई : मुंबईतील (Mumbai) विविध प्राधिकरणांच्या हद्दीत आरोग्य

Mahim Crime : धक्कादायक! मोबाईलच्या किरकोळ वादावरून थेट चाकूचे सपासप वार; माहिम स्टेशनबाहेर तरुणावर हल्ला

मुंबई : मुंबईत किरकोळ कारणावरून होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

BMC News : महापालिका सभागृह आता भरणार दर सोमवारी आणि गुरुवारी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभा या महिन्याला चार किंवा पाच घेण्याची प्रथा असली तरी या महापालिकेत अभ्यासू