मागणी घटल्याने कांद्याच्या दरात घसरण, शेतकऱ्याची चिंता वाढली

लासलगाव : मागील काही दिवसापासून सातत्याने कांद्याच्या मागणीमध्ये घट झाल्यामुळे आणि आवश्यक त्या पद्धतीप्रमाणे खरेदी होत असल्यामुळे भावामध्ये मोठ्या प्रमाणावर ती घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कांद्याचे पीक घेऊन कर्जबाजारी होत असल्याचे चित्र समोर येत आहे.


कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सध्या लासलगाव व पिंपळगाव बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सरासरी दर ७०० ते ८५० रुपये क्विंटल इतके असून, उत्पादन खर्च १२०० ते १४०० रुपये क्विंटल आहे. या तफावतीमुळे शेतकरी आर्थिक खाईत लोटला गेला.


लासलगाव बाजार समितीत दररोज सरासरी १८ ते २० हजार क्विंटल कांद्याची आवक असूनही व्यापाऱ्यांची मागणी मंदावली आहे. 'नाफेड'ची खरेदी निवडक बाजारा समितीमध्ये झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. परिणामी, मोठ्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.


सातत्याने कांद्याच्या दरामध्ये घट होण्यामागे या परिसरातील जाणकारांच्या मते बाजारातील कांद्याची मागणी ही कमी झालेली आहे. कांद्याची साठवणूक करण्याची मर्यादा यावर मोठा परिणाम करीत आहे. निर्यात क्षेत्रामध्ये केंद्र सरकारचे जे धोरण आहे. ते पूर्णपणे धरसोड वृत्तीचे आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हात दरावरती होत आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,