रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती

नवी दिल्ली : रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी सोनाली मिश्रा यांची रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या निर्णयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सोनाली मिश्रा ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत म्हणजेच सेवानिवृत्त होईपर्यंत रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी कार्यरत राहणार आहेत.

रेल्वेची संपत्ती आणि रेल्वे प्रवाशांचे संरक्षण यासाठी रेल्वे सुरक्षा दल कार्यरत आहे. या दलाचे नेतृत्व वरिष्ठ आयपीएस अधिकारी सोनाली मिश्रा करणार आहेत.

केंद्र सरकारने १९५७ मध्ये एक अधिसूचना जारी करुन रेल्वे सुरक्षा दलाची स्थापना केली. या दलाला १९६६ मध्ये रेल्वेच्या आणि प्रवाशांच्या संपत्तीची नासधूस तसेच चोरी करणाऱ्यांना अटक करण्याचे तसेच त्यांची चौकशी करण्याचे आणि त्यांच्या विरोधात कोर्टात खटले चालवण्याचे अधिकार मिळाले. पुढे २० सप्टेंबर १९८५ रोजी रेल्वे सुरक्षा दलाला केंद्रीय सशस्त्र दलाचे स्वरुप देण्यात आले.

सोनाली मिश्रा या १९९३ च्या मध्य प्रदेश कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची २०२१ मध्ये पंजाबमध्ये भारत - पाकिस्तान सीमेवर नियुक्त केलेल्या महिला जवानांच्या कमांडर या पदावर नियुक्ती झाली. याआधी सोनाली मिश्रा यांनी काश्मीरमध्ये पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी काही काळ सीमा सुरक्षा दलाच्या गुप्तचर यंत्रणेचेही नेतृत्व केले होते. तसेच सीमा सुरक्षा दलाच्या अतिरिक्त महासंचालपदाचीही जबाबदारी हाताळली आहे.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींनी सोनाली मिश्रा यांना पोलीस पदकाने गौरविले आहे. तसेच सोनाली मिश्रा यांना सागरी क्षेत्रातील पोलीस सेवेसाठीही पदक देऊन गौरविण्यात आले आहे. अनेक महत्त्वाची पदे समर्थपणे हाताळलेल्या सोनाली मिश्रांचा वेगवेगळी पदके देऊन वेळोवेळी गौरव करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे