रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती

नवी दिल्ली : रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी सोनाली मिश्रा यांची रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या निर्णयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सोनाली मिश्रा ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत म्हणजेच सेवानिवृत्त होईपर्यंत रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी कार्यरत राहणार आहेत.

रेल्वेची संपत्ती आणि रेल्वे प्रवाशांचे संरक्षण यासाठी रेल्वे सुरक्षा दल कार्यरत आहे. या दलाचे नेतृत्व वरिष्ठ आयपीएस अधिकारी सोनाली मिश्रा करणार आहेत.

केंद्र सरकारने १९५७ मध्ये एक अधिसूचना जारी करुन रेल्वे सुरक्षा दलाची स्थापना केली. या दलाला १९६६ मध्ये रेल्वेच्या आणि प्रवाशांच्या संपत्तीची नासधूस तसेच चोरी करणाऱ्यांना अटक करण्याचे तसेच त्यांची चौकशी करण्याचे आणि त्यांच्या विरोधात कोर्टात खटले चालवण्याचे अधिकार मिळाले. पुढे २० सप्टेंबर १९८५ रोजी रेल्वे सुरक्षा दलाला केंद्रीय सशस्त्र दलाचे स्वरुप देण्यात आले.

सोनाली मिश्रा या १९९३ च्या मध्य प्रदेश कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची २०२१ मध्ये पंजाबमध्ये भारत - पाकिस्तान सीमेवर नियुक्त केलेल्या महिला जवानांच्या कमांडर या पदावर नियुक्ती झाली. याआधी सोनाली मिश्रा यांनी काश्मीरमध्ये पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी काही काळ सीमा सुरक्षा दलाच्या गुप्तचर यंत्रणेचेही नेतृत्व केले होते. तसेच सीमा सुरक्षा दलाच्या अतिरिक्त महासंचालपदाचीही जबाबदारी हाताळली आहे.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींनी सोनाली मिश्रा यांना पोलीस पदकाने गौरविले आहे. तसेच सोनाली मिश्रा यांना सागरी क्षेत्रातील पोलीस सेवेसाठीही पदक देऊन गौरविण्यात आले आहे. अनेक महत्त्वाची पदे समर्थपणे हाताळलेल्या सोनाली मिश्रांचा वेगवेगळी पदके देऊन वेळोवेळी गौरव करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत

'वन्यजीव संरक्षण अधिनियमात सुधारणा करा'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे.

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण