शुभांशू शुक्ला १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतणार

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उतरणारे पहिले आणि अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची मोहीम अंतिम टप्प्यात आहे. अंतराळवीर आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला १४ जुलै २०२५ रोजी अ‍ॅक्सिओम मिशन ४ मधील क्रू सहकाऱ्यांसह पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करतील. त्यांचे यान मंगळवार १५ जुलै २०२५ रोजी पृथ्वीवर उतरणार आहे. भारतीय वेळेनुसार १५ जुलै रोजी दुपारी तीन वाजता यान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात उतरणार आहे.



यानातून अंतराळवीर २२ तासांचा प्रवास करुन पृथ्वीवर परतणार आहेत. पृथ्वीवर परतताच अंतराळवीरांची १८ दिवसांची मोहीम पूर्ण होणार आहे. अ‍ॅक्स -४ या यानाच्या क्रूमध्ये कमांडर पेगी व्हिट्सन, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) पायलट शुभांशू शुक्ला , युरोपियन अंतराळ संस्थेचे (ईएसए) प्रकल्प अंतराळवीर पोलंडचे स्लावोस "सुवे" उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हनर (हंगेरियन टू ऑर्बिट) अंतराळवीर टिबोर कापू यांचा समावेश आहे. या पथकाने विशिष्ट कक्षेत फिरणाऱ्या प्रयोगशाळेत साठ पेक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोग केले. यापैकी सात प्रयोग हे इस्त्रोने तयार केलेले होते. यात मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मेथी आणि मूग यांचे स्प्राऊटिंग, पाण्यातील सूक्ष्म जीवांचे Regeneration आणि स्नायूंच्या नुकसानावरील संशोधनाचा समावेश आहे. याशिवाय, कर्करोग संशोधन, डीएनए दुरुस्ती आणि अंतराळातील मानसिक तणाव यांचाही अभ्यास केला. हे प्रयोग भविष्यातील गगनयान मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. ही मोहीम भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी मैलाचा दगड आहे. शुभांशू यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अनुभव हा २०२७च्या गगनयान मोहिमेला उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणार आहे. भारताने पाचशे कोटी रुपये खर्चून ही संधी मिळवली, ज्यामुळे २०३५ पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक आणि २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे स्वप्न सत्यात उतरवणं शक्य होणार आहे.

नियोजनानुसार यान सोमवार १४ जुलै २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळे होईल. यानंतर यानाचा पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू होईल. यान मंगळवार १५ जुलै २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात उतरेल.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने