शुभांशू शुक्ला १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतणार

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उतरणारे पहिले आणि अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची मोहीम अंतिम टप्प्यात आहे. अंतराळवीर आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला १४ जुलै २०२५ रोजी अ‍ॅक्सिओम मिशन ४ मधील क्रू सहकाऱ्यांसह पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करतील. त्यांचे यान मंगळवार १५ जुलै २०२५ रोजी पृथ्वीवर उतरणार आहे. भारतीय वेळेनुसार १५ जुलै रोजी दुपारी तीन वाजता यान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात उतरणार आहे.



यानातून अंतराळवीर २२ तासांचा प्रवास करुन पृथ्वीवर परतणार आहेत. पृथ्वीवर परतताच अंतराळवीरांची १८ दिवसांची मोहीम पूर्ण होणार आहे. अ‍ॅक्स -४ या यानाच्या क्रूमध्ये कमांडर पेगी व्हिट्सन, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) पायलट शुभांशू शुक्ला , युरोपियन अंतराळ संस्थेचे (ईएसए) प्रकल्प अंतराळवीर पोलंडचे स्लावोस "सुवे" उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हनर (हंगेरियन टू ऑर्बिट) अंतराळवीर टिबोर कापू यांचा समावेश आहे. या पथकाने विशिष्ट कक्षेत फिरणाऱ्या प्रयोगशाळेत साठ पेक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोग केले. यापैकी सात प्रयोग हे इस्त्रोने तयार केलेले होते. यात मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मेथी आणि मूग यांचे स्प्राऊटिंग, पाण्यातील सूक्ष्म जीवांचे Regeneration आणि स्नायूंच्या नुकसानावरील संशोधनाचा समावेश आहे. याशिवाय, कर्करोग संशोधन, डीएनए दुरुस्ती आणि अंतराळातील मानसिक तणाव यांचाही अभ्यास केला. हे प्रयोग भविष्यातील गगनयान मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. ही मोहीम भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी मैलाचा दगड आहे. शुभांशू यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अनुभव हा २०२७च्या गगनयान मोहिमेला उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणार आहे. भारताने पाचशे कोटी रुपये खर्चून ही संधी मिळवली, ज्यामुळे २०३५ पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक आणि २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे स्वप्न सत्यात उतरवणं शक्य होणार आहे.

नियोजनानुसार यान सोमवार १४ जुलै २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळे होईल. यानंतर यानाचा पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू होईल. यान मंगळवार १५ जुलै २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात उतरेल.

Comments
Add Comment

लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर केंद्र सरकारचा इशारा: भारतावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणार

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून,

भारतातील टीबीविरोधी मोहिमेचा मोठा टप्पा: भारतातील टीबी रुग्णांच्या संख्येत २१ टक्क्यांची घट

पंतप्रधान मोदींची आरोग्य क्षेत्राला शाबासकी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतात क्षयरोग

दिल्ली स्फोट प्रकरणी AIU ची अल फलाह विद्यापीठावर कारवाई

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरात आय ट्वेंटी कारमधील स्फोटकांचा स्फोट झाला. या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी तपास पथकाने

टेलिग्राम हे दहशतवाद्यांसाठी नवीन चॅट डेस्टिनेशन

नवी दिल्ली : दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार बॉम्बस्फोटात सहभागी असलेले डॉ. उमर मोहम्मद आणि त्यांचे साथीदार

दिल्लीतील महिपालपूरमध्ये स्फोटाचा आवाज, महिला घाबरली आणि पोलिसांना दिली माहिती

दिल्ली : राजधानी दिल्लीतील महिपालपूर परिसरात स्फोटासारखा आवाज ऐकू आल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती

दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा : हल्ल्याचे संपूर्ण ब्लूप्रिंट आले समोर !

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन आणि धक्कादायक