शुभांशू शुक्ला १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतणार

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उतरणारे पहिले आणि अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची मोहीम अंतिम टप्प्यात आहे. अंतराळवीर आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला १४ जुलै २०२५ रोजी अ‍ॅक्सिओम मिशन ४ मधील क्रू सहकाऱ्यांसह पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करतील. त्यांचे यान मंगळवार १५ जुलै २०२५ रोजी पृथ्वीवर उतरणार आहे. भारतीय वेळेनुसार १५ जुलै रोजी दुपारी तीन वाजता यान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात उतरणार आहे.



यानातून अंतराळवीर २२ तासांचा प्रवास करुन पृथ्वीवर परतणार आहेत. पृथ्वीवर परतताच अंतराळवीरांची १८ दिवसांची मोहीम पूर्ण होणार आहे. अ‍ॅक्स -४ या यानाच्या क्रूमध्ये कमांडर पेगी व्हिट्सन, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) पायलट शुभांशू शुक्ला , युरोपियन अंतराळ संस्थेचे (ईएसए) प्रकल्प अंतराळवीर पोलंडचे स्लावोस "सुवे" उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हनर (हंगेरियन टू ऑर्बिट) अंतराळवीर टिबोर कापू यांचा समावेश आहे. या पथकाने विशिष्ट कक्षेत फिरणाऱ्या प्रयोगशाळेत साठ पेक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोग केले. यापैकी सात प्रयोग हे इस्त्रोने तयार केलेले होते. यात मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मेथी आणि मूग यांचे स्प्राऊटिंग, पाण्यातील सूक्ष्म जीवांचे Regeneration आणि स्नायूंच्या नुकसानावरील संशोधनाचा समावेश आहे. याशिवाय, कर्करोग संशोधन, डीएनए दुरुस्ती आणि अंतराळातील मानसिक तणाव यांचाही अभ्यास केला. हे प्रयोग भविष्यातील गगनयान मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. ही मोहीम भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी मैलाचा दगड आहे. शुभांशू यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अनुभव हा २०२७च्या गगनयान मोहिमेला उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणार आहे. भारताने पाचशे कोटी रुपये खर्चून ही संधी मिळवली, ज्यामुळे २०३५ पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक आणि २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे स्वप्न सत्यात उतरवणं शक्य होणार आहे.

नियोजनानुसार यान सोमवार १४ जुलै २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळे होईल. यानंतर यानाचा पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू होईल. यान मंगळवार १५ जुलै २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात उतरेल.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ