शुभांशू शुक्ला १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतणार

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उतरणारे पहिले आणि अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची मोहीम अंतिम टप्प्यात आहे. अंतराळवीर आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला १४ जुलै २०२५ रोजी अ‍ॅक्सिओम मिशन ४ मधील क्रू सहकाऱ्यांसह पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करतील. त्यांचे यान मंगळवार १५ जुलै २०२५ रोजी पृथ्वीवर उतरणार आहे. भारतीय वेळेनुसार १५ जुलै रोजी दुपारी तीन वाजता यान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात उतरणार आहे.



यानातून अंतराळवीर २२ तासांचा प्रवास करुन पृथ्वीवर परतणार आहेत. पृथ्वीवर परतताच अंतराळवीरांची १८ दिवसांची मोहीम पूर्ण होणार आहे. अ‍ॅक्स -४ या यानाच्या क्रूमध्ये कमांडर पेगी व्हिट्सन, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) पायलट शुभांशू शुक्ला , युरोपियन अंतराळ संस्थेचे (ईएसए) प्रकल्प अंतराळवीर पोलंडचे स्लावोस "सुवे" उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हनर (हंगेरियन टू ऑर्बिट) अंतराळवीर टिबोर कापू यांचा समावेश आहे. या पथकाने विशिष्ट कक्षेत फिरणाऱ्या प्रयोगशाळेत साठ पेक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोग केले. यापैकी सात प्रयोग हे इस्त्रोने तयार केलेले होते. यात मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मेथी आणि मूग यांचे स्प्राऊटिंग, पाण्यातील सूक्ष्म जीवांचे Regeneration आणि स्नायूंच्या नुकसानावरील संशोधनाचा समावेश आहे. याशिवाय, कर्करोग संशोधन, डीएनए दुरुस्ती आणि अंतराळातील मानसिक तणाव यांचाही अभ्यास केला. हे प्रयोग भविष्यातील गगनयान मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. ही मोहीम भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी मैलाचा दगड आहे. शुभांशू यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अनुभव हा २०२७च्या गगनयान मोहिमेला उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणार आहे. भारताने पाचशे कोटी रुपये खर्चून ही संधी मिळवली, ज्यामुळे २०३५ पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक आणि २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे स्वप्न सत्यात उतरवणं शक्य होणार आहे.

नियोजनानुसार यान सोमवार १४ जुलै २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळे होईल. यानंतर यानाचा पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू होईल. यान मंगळवार १५ जुलै २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात उतरेल.

Comments
Add Comment

देशभरात ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगवर बंदी येणार ?

नवी दिल्ली: देशात वाढत्या ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

दुचाकीच्या धडकेत बसला भीषण आग! २० जणांचा मृत्यू, चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले दु:ख

आंध्र प्रदेशः हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटे आगीबाबत एक मोठी

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून