Accident News: अमरनाथ यात्रेदरम्यान अपघात! कुलगाममध्ये एका ताफ्याच्या तीन बसची टक्कर, अनेकजण जखमी

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील खुदवानी भागात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर अमरनाथ यात्रेच्या ताफ्याच्या तीन बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातात १० हून अधिक यात्रेकरू जखमी झाले आहेत.


बालटालकडे जाणाऱ्या यात्रेच्या ताफ्याच्या तीन बस एकमेकांवर आदळल्याची घटना ताचलू क्रॉसिंगनजीक झाली आहे.


अपघातात जखमी झालेल्या सर्व यात्रेकरूंना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. कैमोह रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली की, सुमारे नऊ यात्रेकरूंना प्राथमिक उपचार दिल्यानंतर अनंतनागमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होण्यास सांगितले आहे. सर्व जखमी यात्रेकरूंच्या दुखापती किरकोळ असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी माहिती दिली.


अपघातातील जखमी प्रवाशांसाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत आणि त्यांच्या सोयी आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१