Accident News: अमरनाथ यात्रेदरम्यान अपघात! कुलगाममध्ये एका ताफ्याच्या तीन बसची टक्कर, अनेकजण जखमी

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील खुदवानी भागात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर अमरनाथ यात्रेच्या ताफ्याच्या तीन बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातात १० हून अधिक यात्रेकरू जखमी झाले आहेत.


बालटालकडे जाणाऱ्या यात्रेच्या ताफ्याच्या तीन बस एकमेकांवर आदळल्याची घटना ताचलू क्रॉसिंगनजीक झाली आहे.


अपघातात जखमी झालेल्या सर्व यात्रेकरूंना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. कैमोह रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली की, सुमारे नऊ यात्रेकरूंना प्राथमिक उपचार दिल्यानंतर अनंतनागमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होण्यास सांगितले आहे. सर्व जखमी यात्रेकरूंच्या दुखापती किरकोळ असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी माहिती दिली.


अपघातातील जखमी प्रवाशांसाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत आणि त्यांच्या सोयी आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च