Accident News: अमरनाथ यात्रेदरम्यान अपघात! कुलगाममध्ये एका ताफ्याच्या तीन बसची टक्कर, अनेकजण जखमी

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील खुदवानी भागात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर अमरनाथ यात्रेच्या ताफ्याच्या तीन बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातात १० हून अधिक यात्रेकरू जखमी झाले आहेत.


बालटालकडे जाणाऱ्या यात्रेच्या ताफ्याच्या तीन बस एकमेकांवर आदळल्याची घटना ताचलू क्रॉसिंगनजीक झाली आहे.


अपघातात जखमी झालेल्या सर्व यात्रेकरूंना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. कैमोह रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली की, सुमारे नऊ यात्रेकरूंना प्राथमिक उपचार दिल्यानंतर अनंतनागमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होण्यास सांगितले आहे. सर्व जखमी यात्रेकरूंच्या दुखापती किरकोळ असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी माहिती दिली.


अपघातातील जखमी प्रवाशांसाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत आणि त्यांच्या सोयी आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या