मुंबई-गोवा महामार्गासाठी 'नो एक्स्टेंशन': गडकरींचा ठेकेदारांना थेट इशारा, मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश!

मुंबई: गेल्या १४ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. कामाला लागलेला प्रचंड विलंब आणि वाढणारा खर्च यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, गडकरींनी ठेकेदारांना 'नो एक्स्टेंशन'चा स्पष्ट इशारा दिला आहे. मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे सक्तीचे आदेश त्यांनी बजावले आहेत.



कोट्यवधींचा वाढीव खर्च, जनतेचा रोष कायम


या महामार्गाच्या रखडलेल्या कामांमुळे वाढीव खर्च २५० ते ३०० कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या १४ वर्षांपासून काम अपूर्ण असल्याने सरकारला विरोधक आणि जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केंद्रीय सार्वजनिक वाहतूक मंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या राष्ट्रीय महामार्गाची वारंवार पाहणी करत आहेत.



डेडलाईन ठरल्या खोट्या, ठेकेदारांची मागणी फेटाळली


यापूर्वी अनेक डेडलाईन देण्यात आल्या होत्या, परंतु त्या सर्व खोट्या ठरल्या. विशेषतः, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील दोन टप्प्यांचे काम वर्षानुवर्षे रखडले आहे. शासनाने अनेक ठेकेदार कंपन्या बदलल्या, पण काम काही पूर्ण झाले नाही. या दोन्ही टप्प्यांसाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी ठेकेदारांनी दिल्लीतील बैठकीत केली होती. मात्र, गडकरींनी ही मागणी ठामपणे फेटाळून लावली आणि त्या मुदतीतच काम पूर्ण करण्याचे कंपन्यांना आदेश दिले.


गडकरींच्या या कठोर भूमिकेनंतर आता मुंबई-गोवा महामार्गाचे अपूर्ण राहिलेले काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा