मुंबई-गोवा महामार्गासाठी 'नो एक्स्टेंशन': गडकरींचा ठेकेदारांना थेट इशारा, मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश!

  49

मुंबई: गेल्या १४ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. कामाला लागलेला प्रचंड विलंब आणि वाढणारा खर्च यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, गडकरींनी ठेकेदारांना 'नो एक्स्टेंशन'चा स्पष्ट इशारा दिला आहे. मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे सक्तीचे आदेश त्यांनी बजावले आहेत.



कोट्यवधींचा वाढीव खर्च, जनतेचा रोष कायम


या महामार्गाच्या रखडलेल्या कामांमुळे वाढीव खर्च २५० ते ३०० कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या १४ वर्षांपासून काम अपूर्ण असल्याने सरकारला विरोधक आणि जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केंद्रीय सार्वजनिक वाहतूक मंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या राष्ट्रीय महामार्गाची वारंवार पाहणी करत आहेत.



डेडलाईन ठरल्या खोट्या, ठेकेदारांची मागणी फेटाळली


यापूर्वी अनेक डेडलाईन देण्यात आल्या होत्या, परंतु त्या सर्व खोट्या ठरल्या. विशेषतः, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील दोन टप्प्यांचे काम वर्षानुवर्षे रखडले आहे. शासनाने अनेक ठेकेदार कंपन्या बदलल्या, पण काम काही पूर्ण झाले नाही. या दोन्ही टप्प्यांसाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी ठेकेदारांनी दिल्लीतील बैठकीत केली होती. मात्र, गडकरींनी ही मागणी ठामपणे फेटाळून लावली आणि त्या मुदतीतच काम पूर्ण करण्याचे कंपन्यांना आदेश दिले.


गडकरींच्या या कठोर भूमिकेनंतर आता मुंबई-गोवा महामार्गाचे अपूर्ण राहिलेले काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

मतदार यादीतून माझे नाव गायब होऊ शकते तर..., तेजस्वी यादवच्या या आरोपावर निवडणूक आयोगाचे आले स्पष्टीकरण

पाटणा : बिहारच्या मतदार यादीतून तेजस्वी यादव यांचे नाव वगळण्यात आलेले नाही. पाटणा जिल्हा प्रशासनाने तेजस्वी

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा