Chatrapati Shivaji Maharaj : महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण! शिवनेरी ते जिंजी...राज्यातील १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे. महाराजांच्या कोणत्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे ते जाणून घ्या...



शिवनेरी



महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचं स्थान आहे.



राजगड



राजगडला स्वराज्याची पहिली राजधानी म्हटलं जातं. या किल्ल्यावरूनच महाराजांनी मोगलांशी अनेक लढाया लढल्या आणि स्वराज्याचा पाया मजबूत केला.



प्रतापगड




येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात लढाई झाली होती. त्यामुळे या किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात फार मोठं स्थान आहे.




पन्हाळा




महाराजांनी जिंकलेल्या प्रत्येक किल्ल्याला एक इतिहास आहे. शिवा काशीद आणि बाजीप्रभूंच्या बलिादानाने पन्हाळा किल्ला अजरामर झाला.



रायगड




स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ल्यात शिवराज्याभिषेक झाला.

साल्हेर




एक डोंगरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत किल्ला स्वराज्यात दाखल झाला.



लोहगड



पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराजवळ लोहगड किल्ला आहे. किल्ल्यावर ऐतिहासिक वास्तू आहेत.



खांदेरी




खांदेरी हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. इंग्रजांवर वचक बवण्यसाठी शिवाजी महाराजांनी या जलदुर्गाची निर्मिती केली.


सुवर्णदुर्ग



रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराच्या जवळ, हर्णे बंदरात, समुद्रातील एका बेटावर हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमारासाठी हा किल्ला बांधला.



विजयदुर्ग




मराठा साम्राज्याची पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्धी, इंग्रजांपासून रक्षणासाठी उभारलेला होता. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे एक प्रमुख ठिकाण म्हणून विजयदुर्गला ओळखलं जातं.



सिंधुदुर्ग




छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आदी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केली.



जिंजी



हा किल्ला तामिळनाडू राज्यात आहे. दक्षिण भारताची ग्रेट वॉल म्हणून जिंजी किल्ल्याची ओळख आहे.


Comments
Add Comment

Mumbai Goa National Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अल्टो कार २५ फूट दरीत कोसळली; पाच जण गंभीर जखमी

Jalna Bribe Case : पार्टी सुरू व्हायच्या आधीच वाजले बारा! एसीबीने जालनाच्या तहसीलदारांच्या घरात टाकला छापा

जालना: जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांना लाच (Bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक

Chitra Wagh : डहाणूतील संतापजनक प्रकरणावर चित्रा वाघ आक्रमक; दोन बहिणींवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे घडलेल्या एका लव्ह जिहादच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या

Nashik TCS Case : नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित प्रकरणात नवा दावा; निदा खानने केला 'त्या' घटनेचा खुलासा

नाशिक : नाशिकमधील एका आयटी कंपनीशी संबंधित कथित लैंगिक छळ (sexual harassment) आणि धर्मांतर प्रकरणाचा (Religious conversion) तपास सुरू

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली