Chatrapati Shivaji Maharaj : महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण! शिवनेरी ते जिंजी...राज्यातील १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे. महाराजांच्या कोणत्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे ते जाणून घ्या...



शिवनेरी



महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचं स्थान आहे.



राजगड



राजगडला स्वराज्याची पहिली राजधानी म्हटलं जातं. या किल्ल्यावरूनच महाराजांनी मोगलांशी अनेक लढाया लढल्या आणि स्वराज्याचा पाया मजबूत केला.



प्रतापगड




येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात लढाई झाली होती. त्यामुळे या किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात फार मोठं स्थान आहे.




पन्हाळा




महाराजांनी जिंकलेल्या प्रत्येक किल्ल्याला एक इतिहास आहे. शिवा काशीद आणि बाजीप्रभूंच्या बलिादानाने पन्हाळा किल्ला अजरामर झाला.



रायगड




स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ल्यात शिवराज्याभिषेक झाला.

साल्हेर




एक डोंगरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत किल्ला स्वराज्यात दाखल झाला.



लोहगड



पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराजवळ लोहगड किल्ला आहे. किल्ल्यावर ऐतिहासिक वास्तू आहेत.



खांदेरी




खांदेरी हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. इंग्रजांवर वचक बवण्यसाठी शिवाजी महाराजांनी या जलदुर्गाची निर्मिती केली.


सुवर्णदुर्ग



रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराच्या जवळ, हर्णे बंदरात, समुद्रातील एका बेटावर हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमारासाठी हा किल्ला बांधला.



विजयदुर्ग




मराठा साम्राज्याची पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्धी, इंग्रजांपासून रक्षणासाठी उभारलेला होता. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे एक प्रमुख ठिकाण म्हणून विजयदुर्गला ओळखलं जातं.



सिंधुदुर्ग




छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आदी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केली.



जिंजी



हा किल्ला तामिळनाडू राज्यात आहे. दक्षिण भारताची ग्रेट वॉल म्हणून जिंजी किल्ल्याची ओळख आहे.


Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील