कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू

केडीएमसी क्षेत्रात नागरी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर


कल्याण (प्रतिनिधी): कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात डेग्यूमुळे कल्याणातील बेतुरकर पाडा परिसरातील एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने आरोग्य यंत्रणासह, घनकचरा व्यवस्थापनाच्या जंतुनाशक फवारणी, घुरवणी आणि डेग्यु, मलेरिया, ताप, साथरोग याबाबत जनजागृती मोहीम प्रभावीपणे का राबविली जात नाही. परिसर स्वच्छता मोहीम कागदावरच का ? असा संतप्त सवाल यानिमित्ताने होत आहे.


कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा परिसरात राहत असलेल्या तरूण विलास म्हात्रे यांचा गुरुवारी सकाळी डेंग्यूमुळे दुर्दैवी मुत्यु झाला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरी आरोग्य प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे. बुधवारी मनसे पक्षाने थेट मुख्यालयावर धडक देत, डेंग्यू मलेरिया संदर्भात प्रश्नाला जाब विचारत प्रशासनाला धारेवर धरले. तरी प्रशासन यंत्रणा जागी झाली नसल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने पावसाळा पार्श्वभूमीवर मनपा क्षेत्रात व्यापक घुरवणी, फवारणी, अळीनाशक, जंतुनाशक फवारणी मोहीम होणे गरजेचे आहे. व्यापक जनजागृती माध्यमातून दक्षता काय घ्यावी हे जनसामान्यांना पर्यंत पोहचविणे गरजेचे दिसत आहे.


मे पासून आत्तापर्यंत केडीएमसी हद्दीत डेंगूचे ३५ रुग्ण आहेत. तसेच मलेरियाचे जून महिन्यात ४१ रुग्ण आढळून आले. जुलै महिन्यात १८ रुग्ण आढळून आले असल्याची त्रोटक माहिती केडीएमसी प्रशासनाकडून बुधवारी देण्यात आली होती. तर केडीएमसीकडून आत्तापर्यंत २८ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून जवळपास ३५० घराजवळ कंटेनर इममध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्याचा अहवाल समोर आला आहे. यासंदर्भात डेंग्यूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस ड्राय डे मार्फत पाणी साठवणूक टाळून डेंग्यू मच्छर संभाव्य वाढीस पोषक वातावरण होणार नाही ही दक्षता घेतली पाहिजे.


पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या घटक यांत पाणी साठणार नाही. मांची दक्षता घेतली पाहिजे. मेलरिया, डेग्यु संदर्भात आरोग्य विभागातील कर्मचारी सर्व्हेक्षण स्लम एरिमा ते संकुला पर्यंत केले जाते. ज्या परिसरात संभाव्य डेग्यु रूग्ण आढळल्यास त्या परिसरात धुरवणी फवारणी आदी तातडीने केली जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यामांना सांगितले.

Comments
Add Comment

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक

धाराशिवमध्ये हिट अँड रन, ऊसतोड मजुरांना उडवले

धाराशिव : धाराशिवमधील कळंब लातूर रस्त्यावर हिट हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने ऊसतोड

Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

गोंदिया : राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी