इनाम उल हक आणि राधिकाचं एकत्र फिरणंच ठरलं तिच्या हत्येचं कारण ?

गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्राममध्ये राहणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर टेनिसपटू म्हणून प्रगती करत असलेल्या आणि स्वतःची टेनिस अकादमी चालवत असलेल्या राधिक यादवची तिचे वडील दीपक यादव यांनीच हत्या केली. दीपक यादव यांनी मुलीवर पाच गोळ्या झाडल्या. यापैकी तीन गोळ्या राधिकाला लागल्या. जवळून झालेल्या गोळीबारामुळे गंभीर जखमी झालेल्या राधिकाचा थोड्याच वेळात मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी राधिकाच्या वडिलांना अटक केली आहे. दीपक यादव यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात आता नवी माहिती हाती येऊ लागली आहे. इनाम उल हक आणि राधिकाचं एकत्र फिरणंच तिच्या हत्येचं कारण ठरल्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.

राधिकाला टेनिस अकादमीतून मोठं उत्पन्न मिळत होतं. या पैशांवर यादव कुटुंब सुखात राहत होतं. पण मागील काही दिवसांपासून ओळखीतल्या काही जणांनी दीपक यांना राधिकाच्या अकादमीवरुन टोमणे मारायला सुरुवात केली होती. मुलीच्या पैशांवर आईवडील जगत आहेत, असं काही जण उघडपणे दीपक यांच्यासमोर बोलायचे. हा प्रकार असह्य झाला आणि दीपक यांनी राधिकाची हत्या केली, असा संशय सुरुवातीला व्यक्त होत होता. पण हत्येचे कारण वेगळेच असल्याचे पोलीस चौकशीतून पुढे आले आहे.

टेनिस अकादमीतून उत्तम कमाई करुन घर चालवत असलेली राधिका मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाप्रेमी झाली होती. राधिकाला नवनवी रील करण्याचं वेड लागलं होतं. तिचे अनेक मित्र होते. या मित्रांसोबत बिनधास्त फिरायला जायचे आणि तिथे व्हिडीओ करुन सोशल मीडियावर पोस्ट करायचे हा प्रकार वाढ चालला होता. मागील काही दिवसांपासून राधिका इनाम उल हक सोबत जास्त फिरत होती. राधिकाचे इनाम उल हक सोबतचे व्हिडीओ वाढले होते. हा प्रकार राधिकाचे वडील दीपक यादव यांना बिलकूल आवडला नव्हता. याच कारणामुळे संतापलेल्या दीपक यादव यांनी राधिकाची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती