माओवादी विचारसरणी नियंत्रणासाठी 'महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक-२०२४' विधान परिषदेत मंजूर

मुंबई: देशाच्या संविधानाला आव्हान देणाऱ्या आणि कडव्या डाव्या तसेच माओवादी प्रवृत्तीच्या संघटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक-२०२४' विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक सभागृहात मांडले आणि त्यामागील कारणे तसेच गरज स्पष्ट केली. सखोल चर्चेनंतर सभापती प्रा. राम शिंदे यांनी हे विधेयक बहुमताने मंजूर झाल्याचे जाहीर केले.


गृहराज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले की, हे विधेयक कोणत्याही सामान्य व्यक्ती किंवा सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात नाही. तर, लोकशाहीला आव्हान देणाऱ्या आणि शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्यासाठी आहे. राज्यात सध्या अशा प्रकारच्या ६४ संघटना सक्रिय असून, त्यांचा पायापासून बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


कदम यांनी UAPA कायद्याच्या (Unlawful Activities (Prevention) Act) मर्यादा अधोरेखित केल्या. ते म्हणाले, "UAPA फक्त हिंसक घटना घडल्यास लागू होतो. मात्र, सध्या नक्षलवादी विचारसरणी हिंसाचाराशिवायच शहरांमध्ये शिरकाव करत आहे. त्यामुळे त्यांच्या या पद्धतीला थोपवण्यासाठी स्वतंत्र कायद्याची गरज होती." त्यांनी साईबाबा प्रकरणाचे उदाहरण देत सांगितले की, केवळ विचारांच्या आधारे दोष सिद्ध करणे UAPA अंतर्गत शक्य नसते.


या विधेयकानुसार, कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्यापूर्वी एक सल्लागार मंडळ स्थापन केले जाईल. यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आणि सरकारी वकील यांचा समावेश असेल. या मंडळासमोर सर्व पुरावे सादर केले जातील आणि त्यांच्या शिफारशीनंतरच संबंधित संघटनेवर बंदी घालण्यात येईल. याशिवाय, बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा सदस्य असलेल्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई केली जाईल.


गृहराज्यमंत्री कदम यांनी शेवटी पुन्हा स्पष्ट केले की, हा कायदा सामान्य आंदोलकांवर किंवा सरकारविरोधी मतप्रदर्शन करणाऱ्यांवर नाही, तर केवळ माओवादी विचारसरणीच्या फैलावावर नियंत्रण आणण्यासाठी आहे.

Comments
Add Comment

BMC : नाना शंकरशेठ यांच्या स्मारक उभारणीची प्रतीक्षा संपली, महापालिका स्वनिधीतून उभारणार स्मारक

बांधकामासाठी कंत्राटदाराची अखेर निवड मुंबई (सचिन धानजी) : आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक

BMC : नालेसफाईचे काम १०० टक्के तर मग गाळ आणि कचऱ्याचे तुडुंब नाले भरलेले कसे?

मनसेचे महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांचा सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी): सत्ताधारी आणि प्रशासन कितीही ओरडून

BMC News : मुंबईत १,१२४ दुकानांना मराठीतील फलकांची ऍलर्जी

महिनाभरात ३५ हजारांहून अधिक दुकानांच्या तपासणीतून झाले उघड मुंबई : मराठी भाषेतील नामफलक सक्तीच्या

BMC : महापालिकेच्या किती कर्मचाऱ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही

स्थायी समिती सदस्याने केली विचारणा समितीपुढे माहिती सादर करण्याची केली मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

Artificial intelligence (AI) : एआयने शोधली कंत्राटदारांची हातचलाखी

नालेसफाई कामांमध्ये कंपन्यांना ९.२५ कोटी रुपयांचा दंड मुंबई : नाले स्वच्छतेच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)

EL Nino : 'अल निनो'मुळे दुष्काळाचा धोका ? पाणी जपून वापरण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्‍याची