Medical College : 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

अहिल्यानगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातचं होणार असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. हे महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच व्हावे, या मागणीसाठी गुरुवारी ( १० जुलै) आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी करून आमदार जगताप यांना आश्वासन दिले.



यावेळी दिलेल्या निवेदनात जगताप यांनी म्हटले आहे, की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. हे महाविद्यालय शहरातील मध्यवर्ती ठिकाणी होणे गरजेचे आहे. जेणेकरुन शहरातील सर्व नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सोयीचे होईल. या महाविद्यालयासाठी अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या नालेगाव परिसरातील कृषी विभागाची २५ एकर जमीन उपलब्ध आहे. सध्या ही जागा वापरात नाही. त्या जागी जर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यास सर्व नागरिकांची चांगली सोय होईल. अहिल्यानगर जिल्ह्यासह सोलापूर, पुणे व मनमाड जिल्ह्यांना जोडणारा हा मध्यवर्ती भाग आहे. त्यामुळे हे महाविद्यालय शहरातच व्हावे, अशी मागणी जगताप यांनी केली होती. आता मुख्यमंत्र्यांशी हे महाविद्यालय शहरातच होईल, अशी घोषणा केली आहे.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून