Medical College : 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

अहिल्यानगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातचं होणार असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. हे महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच व्हावे, या मागणीसाठी गुरुवारी ( १० जुलै) आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी करून आमदार जगताप यांना आश्वासन दिले.



यावेळी दिलेल्या निवेदनात जगताप यांनी म्हटले आहे, की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. हे महाविद्यालय शहरातील मध्यवर्ती ठिकाणी होणे गरजेचे आहे. जेणेकरुन शहरातील सर्व नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सोयीचे होईल. या महाविद्यालयासाठी अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या नालेगाव परिसरातील कृषी विभागाची २५ एकर जमीन उपलब्ध आहे. सध्या ही जागा वापरात नाही. त्या जागी जर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यास सर्व नागरिकांची चांगली सोय होईल. अहिल्यानगर जिल्ह्यासह सोलापूर, पुणे व मनमाड जिल्ह्यांना जोडणारा हा मध्यवर्ती भाग आहे. त्यामुळे हे महाविद्यालय शहरातच व्हावे, अशी मागणी जगताप यांनी केली होती. आता मुख्यमंत्र्यांशी हे महाविद्यालय शहरातच होईल, अशी घोषणा केली आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण