कल्याणमध्ये पसरली डेंग्यू-मलेरियाची साथ

त्वरित उपाययोजना करण्याची मागणी


कल्याण (प्रतिनिधी) : कल्याणमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली आहे. याबाबत मनसेचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल मांची भेट घेतली. शहरात डेंग्यूचे किती रुग्ण आहेत पाचा आकडा केडीएमसीकडे नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. केडीएमसीच्या रुग्णालयांची दयनीय अवस्था आहे. केडीएमसी आयुक्तांनी बाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, आरोग्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी, तर रस्त्यावरील खड्यांसंदर्भातदेखील प्रशासनाने गंभीर लक्ष दिले पाहिजे आदी मागण्या यावेळी आयुक्तांकडे करण्यात आल्या, तर लवकरात लवकर आरोग्य आणि इतर समस्या न सुटल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा प्रकाश भोईर यांनी दिला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, कैलास पनवेलकर, सचिन पोपलाइतकर, रोहन पोवार, कपिल पवार, गणेश लांडगे, रोहन आक्केवार, संदीप पंडित आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


काही दिवसांपासून डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कल्याण पूर्व-पश्चिम मध्ये अनेक गगनचुंबी बांधकामे सुरू आहेत. तेथे बांधकामासाठी ने पाणी साचवले जाते. त्यात डेंग्यूच्या मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असतो. अनेक हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे तसेच मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही नालेसफाई तसेच गटार सफाई झाली नाही. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.


या अशा अनेक कारणांमुळे डेंग्यूचा संसर्ग तसेच मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ नाकारता येत नाही. डेंग्यू संसर्गामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात त्वरित फॉगिंग व कीटकनाशक फवारणी करावी, साचलेल्या पाण्याचे निर्जुतीकरण व नाल्याची साफसफाई तसेच कचऱ्याची विल्हेवाट दररोज करावी. घरोघरी जाऊन डेंग्यू प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. आरोग्य तपासणी शिबिरे व रक्त तपासणी मोफत उपलब्ध करून द्यावी. आवश्यक असल्यास तात्पुरत्या वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्या यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आल्या.

Comments
Add Comment

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा