राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

मुरबाड : मुरबाड येथील माळशेज-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर नढई मंदिराच्या मागे व नढई-नारीवलीकडे वळण घेऊन जाणाऱ्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. गेले अनेक दिवस हे खड्डे असेच असून राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी किंवा मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना खड्डे दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. एखादा मोठा अपघात होऊन जीव जाण्याची वाट प्रशासन बघत आहे का, असा प्रश्न या भागातील नागरिक करत आहेत. या भागातील नागरिकांना प्रवासासाठी एकमेव हाच मार्ग असून रोज शेकडो मोटारसायकल व इतर वाहने या रस्त्यावर ये-जा करत असतात.


या रस्त्यावर दररोज शेकडो डंपर, खडीची वाहतूक करतात. त्यामुळे या पूर्ण रस्त्याची वाताहात झाली आहे. दिवसभरात मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहनांची येथे वाहतूक होत असते; परंतु आरटीओ अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. या वाहनांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. दरम्यान संबधित प्रशासनाने मंदिरा पाठीमागे पडलेले खड्डे त्वरित भरले नाहीत, तर या खड्ड्यात बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे