राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

मुरबाड : मुरबाड येथील माळशेज-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर नढई मंदिराच्या मागे व नढई-नारीवलीकडे वळण घेऊन जाणाऱ्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. गेले अनेक दिवस हे खड्डे असेच असून राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी किंवा मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना खड्डे दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. एखादा मोठा अपघात होऊन जीव जाण्याची वाट प्रशासन बघत आहे का, असा प्रश्न या भागातील नागरिक करत आहेत. या भागातील नागरिकांना प्रवासासाठी एकमेव हाच मार्ग असून रोज शेकडो मोटारसायकल व इतर वाहने या रस्त्यावर ये-जा करत असतात.


या रस्त्यावर दररोज शेकडो डंपर, खडीची वाहतूक करतात. त्यामुळे या पूर्ण रस्त्याची वाताहात झाली आहे. दिवसभरात मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहनांची येथे वाहतूक होत असते; परंतु आरटीओ अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. या वाहनांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. दरम्यान संबधित प्रशासनाने मंदिरा पाठीमागे पडलेले खड्डे त्वरित भरले नाहीत, तर या खड्ड्यात बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Agri AI : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले महाराष्ट्र ‘अॅग्री एआय पॉलिसी’चे कौतुक

मुंबई : महाराष्ट्राने जाहीर केलेली स्वतंत्र ‘अ‍ॅग्री एआय पॉलिसी’ स्वागतार्ह असून इतर राज्यांनीही त्याचे

Pune Airport: हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानसेवा रद्द

पुणे: थायलंडच्या सहलीचं नियोजन करणाऱ्या पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. प्रसिद्ध विमान कंपनी 'इंडिगो'ने

Buldhana News : शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला; गावात संचारबंदी लागू

बुलढाणा : बुलढाणा मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरु झालेला वाद चांगलाच चिघळला आहे. याच

Maharashtra Unseasonal Rain: महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस

मुंबई: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर, गोंदिया

Police: सरकारचा मोठा निर्णय; ५१ हजार पोलिसांना लागू होणार नवा नियम

मुंबई: पोलीस दलातील शिस्त आणि गांभीर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस

साखरपुड्यानंतर ४ दिवसांत जोडप्याचा दुर्दैवी अंत; धाराशिवमध्ये कारचा भीषण अपघात

धाराशिव : लग्नसमारंभाला अवघे काही दिवस बाकी असताना दोन कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. धाराशिव जिल्ह्यातील