राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

मुरबाड : मुरबाड येथील माळशेज-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर नढई मंदिराच्या मागे व नढई-नारीवलीकडे वळण घेऊन जाणाऱ्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. गेले अनेक दिवस हे खड्डे असेच असून राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी किंवा मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना खड्डे दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. एखादा मोठा अपघात होऊन जीव जाण्याची वाट प्रशासन बघत आहे का, असा प्रश्न या भागातील नागरिक करत आहेत. या भागातील नागरिकांना प्रवासासाठी एकमेव हाच मार्ग असून रोज शेकडो मोटारसायकल व इतर वाहने या रस्त्यावर ये-जा करत असतात.


या रस्त्यावर दररोज शेकडो डंपर, खडीची वाहतूक करतात. त्यामुळे या पूर्ण रस्त्याची वाताहात झाली आहे. दिवसभरात मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहनांची येथे वाहतूक होत असते; परंतु आरटीओ अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. या वाहनांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. दरम्यान संबधित प्रशासनाने मंदिरा पाठीमागे पडलेले खड्डे त्वरित भरले नाहीत, तर या खड्ड्यात बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातची ईडी चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश

U-17 National Boxing Championship : गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!

- स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच… नागपूरमध्ये बॉक्सिंगचा थरार रंगात! - ग्लोव्हज हातात… स्टेजवरून दिला जोशपूर्ण

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक