राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

मुरबाड : मुरबाड येथील माळशेज-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर नढई मंदिराच्या मागे व नढई-नारीवलीकडे वळण घेऊन जाणाऱ्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. गेले अनेक दिवस हे खड्डे असेच असून राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी किंवा मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना खड्डे दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. एखादा मोठा अपघात होऊन जीव जाण्याची वाट प्रशासन बघत आहे का, असा प्रश्न या भागातील नागरिक करत आहेत. या भागातील नागरिकांना प्रवासासाठी एकमेव हाच मार्ग असून रोज शेकडो मोटारसायकल व इतर वाहने या रस्त्यावर ये-जा करत असतात.


या रस्त्यावर दररोज शेकडो डंपर, खडीची वाहतूक करतात. त्यामुळे या पूर्ण रस्त्याची वाताहात झाली आहे. दिवसभरात मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहनांची येथे वाहतूक होत असते; परंतु आरटीओ अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. या वाहनांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. दरम्यान संबधित प्रशासनाने मंदिरा पाठीमागे पडलेले खड्डे त्वरित भरले नाहीत, तर या खड्ड्यात बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Comments
Add Comment

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातल्या आरोपीने लपवलेल्या मोबाईलमध्ये मिळाला मृत्यूपूर्वीचा 'तो' फोटो...

फलटण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही मुंबई : स्थानिक

Maharashtra Local Body Election : १० नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होणार? मोठी अपडेट आली समोर

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी माहिती

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणांना अश्लील शिवीगाळ, पत्राद्वारे 'गँगरेप' आणि 'जीवे मारण्याची' धमकी; राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने