प्रिया बापट आणि उमेश कामत सांगणार 'बिन लग्नाची गोष्ट'

१२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र


मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत तब्बल १२ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. त्यांचा आगामी चित्रपट 'बिन लग्नाची गोष्ट' येत्या १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या घोषणेने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


काही वर्षांपासून प्रिया आणि उमेशला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती आणि आता 'बिन लग्नाची गोष्ट' या चित्रपटातून ती पूर्ण होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले, ज्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे.


पोस्टरमधील दृश्यात प्रिया बापट हाताची घडी घालून, मिश्कील चेहऱ्याने आत्मविश्वासाने उभी दिसते, तर उमेश कामत हातात हार आणि डोक्यावर मुंडावळ्या बांधून लग्नासाठी तयार असल्यासारखा दिसतो, पण परिस्थिती काहीतरी वेगळी असल्याचे त्यात सूचित होते. यातूनच ही कथा पारंपरिक विवाहसंस्थेच्या पलीकडे जाऊन नात्यांची नवी मांडणी करणार असल्याचे स्पष्ट होते.


चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी चित्रपटाबद्दल सांगितले की, "ही प्रेमाची, नात्यांमधील समज-गैरसमजांची आणि वर्षानुवर्षे मनात जपलेल्या गाठी सुटण्याची गोष्ट आहे. हा चित्रपट आजच्या काळाचा आरसा असून, प्रेक्षकांना त्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसेल. काहींना नवीन प्रश्न पडतील, तर काहींना जुन्याच प्रश्नांची नवी उत्तरे मिळतील. हलक्या-फुलक्या प्रसंगातून मांडलेली ही गोष्ट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल."


निर्माते नितीन वैद्य यांनी प्रिया आणि उमेशच्या केमिस्ट्रीबद्दल बोलताना आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "प्रिया आणि उमेशची केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी नेहमीच खास असते. इतक्या वर्षांनी ते माझ्या चित्रपटातून एकत्र येत आहेत, याचा मला आनंद आहे. या चित्रपटाची संकल्पना हटके असून ती आजच्या काळाशी थेट संबंधित आहे."


गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित, तसेच तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटाचे सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत.


Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

सणाचा खरा आनंद लुटत जॅकलिनने साजरा केला ख्रिसमस!

मुंबई: देशभरात सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सणाचा खरा उत्साह आणि

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची ग्रँड कमबॅक, मायथॉलॉजिकल एपिकमध्ये हिट जोडी पुन्हा एकत्र

१000 कोटींच्या महाप्रकल्पात अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांच्या रीयुनियनची तयारी आपण अशा एका मोठ्या बातमीबद्दल

दीपिकाच्या आठ तास कामाच्या अटीवर कियाराची प्रतिक्रिया, मातृत्वाबद्दल काय सांगतेय अभिनेत्री?

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सिनेसृष्टीत आठ तासांच्या कामाची मागणी केल्यामुळे बऱ्याच

आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही

धुरंधर स्टार रणवीर सिंगचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी भरभरून कौतुक केले, जाणून घ्या त्यांना “ज्वालामुखी” का म्हटले

धुरंधर बॉक्स ऑफिसवर सातत्याने शानदार कामगिरी करत आहे आणि आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की रणवीर सिंगबाबत