राजस्थानमध्ये हवाई दलाचे जग्वार विमान कोसळले, वैमानिकांचा मृत्यू

चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या अपघातात वैमानिक आणि सहवैमानिक यांचा मृत्यू झाला.



ब्रिटिश-फ्रेंच SEPECAT जग्वार सुपरसॉनिक विमान भारताने १९७० च्या दशकात खरेदी केले होते. यातलेच एक जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. हा यंदाच्या वर्षातला जॅग्वार लढाऊ विमानाचा तिसरा अपघात आहे. पहिला अपघात याच वर्षी ७ मार्च रोजी हरियाणाच्या पंचकुला येथे आणि दुसरा अपघात २ एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगरजवळ झाला होता.

चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ कोसळलेल्या विमानाचे राजस्थानच्या सुरतगड हवाई दल तळावरून उड्डाण झाले होते.

भारताकडे किमान १२० सक्रीय जॅग्वार लढाऊ विमानांचा ताफा आहे. या जुन्या विमानांपैकी अनेक विमानांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. कोसळलेले विमान हे आधुनिकीकरण केलेल्या विमानांपैकी होते की जुन्या जॅग्वारपैकी होते हे अद्याप समजलेले नाही.

याआधी एप्रिल महिन्यात गुजरातमध्ये कोसळलेल्या जॅग्वार विमानाच्या वैमानिकाचा मृत्यू झाला आणि सहवैमानिक जखमी झाला होता तर पंजाबमध्ये कोसळलेल्या विमानामुळे जीवितहानी झाली नव्हती.
Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे