राजस्थानमध्ये हवाई दलाचे जग्वार विमान कोसळले, वैमानिकांचा मृत्यू

  75

चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या अपघातात वैमानिक आणि सहवैमानिक यांचा मृत्यू झाला.



ब्रिटिश-फ्रेंच SEPECAT जग्वार सुपरसॉनिक विमान भारताने १९७० च्या दशकात खरेदी केले होते. यातलेच एक जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. हा यंदाच्या वर्षातला जॅग्वार लढाऊ विमानाचा तिसरा अपघात आहे. पहिला अपघात याच वर्षी ७ मार्च रोजी हरियाणाच्या पंचकुला येथे आणि दुसरा अपघात २ एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगरजवळ झाला होता.

चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ कोसळलेल्या विमानाचे राजस्थानच्या सुरतगड हवाई दल तळावरून उड्डाण झाले होते.

भारताकडे किमान १२० सक्रीय जॅग्वार लढाऊ विमानांचा ताफा आहे. या जुन्या विमानांपैकी अनेक विमानांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. कोसळलेले विमान हे आधुनिकीकरण केलेल्या विमानांपैकी होते की जुन्या जॅग्वारपैकी होते हे अद्याप समजलेले नाही.

याआधी एप्रिल महिन्यात गुजरातमध्ये कोसळलेल्या जॅग्वार विमानाच्या वैमानिकाचा मृत्यू झाला आणि सहवैमानिक जखमी झाला होता तर पंजाबमध्ये कोसळलेल्या विमानामुळे जीवितहानी झाली नव्हती.
Comments
Add Comment

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये