राजस्थानमध्ये हवाई दलाचे जग्वार विमान कोसळले, वैमानिकांचा मृत्यू

चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या अपघातात वैमानिक आणि सहवैमानिक यांचा मृत्यू झाला.



ब्रिटिश-फ्रेंच SEPECAT जग्वार सुपरसॉनिक विमान भारताने १९७० च्या दशकात खरेदी केले होते. यातलेच एक जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. हा यंदाच्या वर्षातला जॅग्वार लढाऊ विमानाचा तिसरा अपघात आहे. पहिला अपघात याच वर्षी ७ मार्च रोजी हरियाणाच्या पंचकुला येथे आणि दुसरा अपघात २ एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगरजवळ झाला होता.

चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ कोसळलेल्या विमानाचे राजस्थानच्या सुरतगड हवाई दल तळावरून उड्डाण झाले होते.

भारताकडे किमान १२० सक्रीय जॅग्वार लढाऊ विमानांचा ताफा आहे. या जुन्या विमानांपैकी अनेक विमानांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. कोसळलेले विमान हे आधुनिकीकरण केलेल्या विमानांपैकी होते की जुन्या जॅग्वारपैकी होते हे अद्याप समजलेले नाही.

याआधी एप्रिल महिन्यात गुजरातमध्ये कोसळलेल्या जॅग्वार विमानाच्या वैमानिकाचा मृत्यू झाला आणि सहवैमानिक जखमी झाला होता तर पंजाबमध्ये कोसळलेल्या विमानामुळे जीवितहानी झाली नव्हती.
Comments
Add Comment

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश