राजस्थानमध्ये हवाई दलाचे जग्वार विमान कोसळले, वैमानिकांचा मृत्यू

चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या अपघातात वैमानिक आणि सहवैमानिक यांचा मृत्यू झाला.



ब्रिटिश-फ्रेंच SEPECAT जग्वार सुपरसॉनिक विमान भारताने १९७० च्या दशकात खरेदी केले होते. यातलेच एक जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. हा यंदाच्या वर्षातला जॅग्वार लढाऊ विमानाचा तिसरा अपघात आहे. पहिला अपघात याच वर्षी ७ मार्च रोजी हरियाणाच्या पंचकुला येथे आणि दुसरा अपघात २ एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगरजवळ झाला होता.

चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ कोसळलेल्या विमानाचे राजस्थानच्या सुरतगड हवाई दल तळावरून उड्डाण झाले होते.

भारताकडे किमान १२० सक्रीय जॅग्वार लढाऊ विमानांचा ताफा आहे. या जुन्या विमानांपैकी अनेक विमानांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. कोसळलेले विमान हे आधुनिकीकरण केलेल्या विमानांपैकी होते की जुन्या जॅग्वारपैकी होते हे अद्याप समजलेले नाही.

याआधी एप्रिल महिन्यात गुजरातमध्ये कोसळलेल्या जॅग्वार विमानाच्या वैमानिकाचा मृत्यू झाला आणि सहवैमानिक जखमी झाला होता तर पंजाबमध्ये कोसळलेल्या विमानामुळे जीवितहानी झाली नव्हती.
Comments
Add Comment

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका