कार्यालयीन वेळेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होईल, मुंबईतील डबेवाल्यांकडून भीती व्यक्त

कांदिवली (वार्ताहर) : कार्यालयाच्या वेळेत बदल झाल्यास जेवणाच्या वेळेतही बदल होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मुंबईतील डबेवाल्पांची पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मा आनुषंगाने, कार्यालयाच्या वेळेत बदल करा मात्र दुपारच्या जेवणाची वेळेत शक्य तो बदल करू नये अशी मागणी मुंबई डबेवाल्यांकडून करण्यात येणार असल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.


मध्य रेल्वेने मुंबईतील शासकीय आणि खासगी अशा ८०० पेक्षा जास्त कार्यालयांना कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्याबाबत पत्र पाठवले आहे. सध्याच्या कार्यालयीन वेळेमुळे लोकल रेल्वेत प्रचंड गर्दी होते. ही समस्या सोडवण्यासाठी कार्यालयीन वेळांत टप्प्याटप्प्याने बदल करण्यात यावा तसेच राज्य सरकारनेही या विषयात हस्तक्षेप करावा, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.


मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दररोज १८१० लोकल फेल्या त्यांतून ३५ लाखपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. डबेवाला उन्हाळा वा पावसाळा असो वेळेत जेवणाचे डबे पोहोचवितात, मात्र जेवण्याच्या वेळेत बदल झाल्यास, तुटपुंज्या उपन्नासाठी जीवाचे रान करणाऱ्या डबेवाल्यांना तारेवरची नाहक कसरत करावी लागेल, वेळेचे नियोजन न जमल्याने, काही ग्राहक कमी होतील, तसेच काही कमी करावे लागतील यामुळे मासिक उत्पन्नामध्येदेखील घट होऊ शकते अशी भीतीही काही डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी