कार्यालयीन वेळेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होईल, मुंबईतील डबेवाल्यांकडून भीती व्यक्त

  51

कांदिवली (वार्ताहर) : कार्यालयाच्या वेळेत बदल झाल्यास जेवणाच्या वेळेतही बदल होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मुंबईतील डबेवाल्पांची पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मा आनुषंगाने, कार्यालयाच्या वेळेत बदल करा मात्र दुपारच्या जेवणाची वेळेत शक्य तो बदल करू नये अशी मागणी मुंबई डबेवाल्यांकडून करण्यात येणार असल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.


मध्य रेल्वेने मुंबईतील शासकीय आणि खासगी अशा ८०० पेक्षा जास्त कार्यालयांना कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्याबाबत पत्र पाठवले आहे. सध्याच्या कार्यालयीन वेळेमुळे लोकल रेल्वेत प्रचंड गर्दी होते. ही समस्या सोडवण्यासाठी कार्यालयीन वेळांत टप्प्याटप्प्याने बदल करण्यात यावा तसेच राज्य सरकारनेही या विषयात हस्तक्षेप करावा, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.


मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दररोज १८१० लोकल फेल्या त्यांतून ३५ लाखपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. डबेवाला उन्हाळा वा पावसाळा असो वेळेत जेवणाचे डबे पोहोचवितात, मात्र जेवण्याच्या वेळेत बदल झाल्यास, तुटपुंज्या उपन्नासाठी जीवाचे रान करणाऱ्या डबेवाल्यांना तारेवरची नाहक कसरत करावी लागेल, वेळेचे नियोजन न जमल्याने, काही ग्राहक कमी होतील, तसेच काही कमी करावे लागतील यामुळे मासिक उत्पन्नामध्येदेखील घट होऊ शकते अशी भीतीही काही डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.

मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ‘डीजी’ नोंदणी बंधनकारक

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मुंबई  : कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर ‘डीजी ॲप’वर

Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana : "कबुतरखाने अचानक बंद करू नका", कबुतरांना खुराक देण्याची जबाबदारी बीएमसीचीच...फडणवीसांची सूचना

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कठोर कारवाई सुरू केली होती.

Dattatray Bharane : दत्तात्रय भरणे कृषीमंत्री पदावर; "राज्यात विविध भागांमध्ये फिरा, मी पाठीशी"...फडणवीसांच आश्वासन

‘शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार, निर्णय घेणार’ : मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई : विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना