Pravin Darekar: "नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन विशेष उपाययोजना करणार का?: आमदार दरेकर यांचा पर्यावरण मंत्र्यांना सवाल

मुंबई: आज विधानपरिषदेच्या सभागृहात सदस्य रणजित सिंह मोहिते पाटील यांनी राज्यातील नद्याचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत आमदार प्रविण दरेकर यांनी सहभाग घेत कोकणातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन विशेष उपाययोजना करणार का? असा सवाल पर्यावरण मंत्र्यांना केला.

काय म्हणाले आमदार प्रवीण दरेकर?


आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, राष्ट्रीय जलगुणवत्ता मोजमाप योजनेनुसार जे सर्वेक्षण केले त्यामध्ये ५६ नदीपट्ट्यांचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्रात अनेक नद्या आहेत. कोकणात बऱ्याच ठिकाणी एमआयडीसी आहेत. महाड, माणगाव, रोहा, खेड, चिपळूण येथे केमिकल कंपन्या आहेत. येथील सर्व नद्यामध्ये केमिकलचे पाणी जाते. त्यामुळे माशांवर परिणाम होतो. त्यावर ऍक्शन प्लॅन नाही. ज्या केमिकल कंपन्या आहेत व बाजूला ज्या नद्या आहेत त्या प्रदूषित होऊ नयेत. यासंदर्भात सर्वकष केमिकल कंपनी, एमआयडीसी यांचा आढावा घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी विशेष उपाययोजना शासन करणार का? असा सवाल केला.

दरेकरांच्या प्रश्नावर बोलताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, विशेष उपाययोजना करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार यांचा संवाद असेल तर त्याचा फायदा होतो. या नद्यांचे मोजमाप केले असून भव्य निधी केंद्राने दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नद्यांच्या पुनर्जीवनाचा कार्यक्रम हाती घेतलाय. राज्य त्या नेतृत्वाखाली काम करतेय. दरेकर यांनी सांगितलेल्या नद्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊ, असे उत्तर दिले.
Comments
Add Comment

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा

थ्री इडियट्सचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार, सिनेप्रेमींची वाढली उत्सुकता

मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री