ENG vs IND: लॉर्ड्सच्या मैदानावर कोण मारणार बाजी?

मुंबई:  भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी १० जुलैपासून ऐतिहासिक अशा लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

टीम इंडियाने एजबेस्टन कसोटी जिंकून 'तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी' मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. यामुळे उर्वरीत तीन सामन्यासाठी रोमांच निर्माण झाला आहे. आता मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक लॉईस क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे, जिथे मागील दौन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर संस्मरणीय विजय मिळवला होता.

गुरुवारपासून सुरू होणाऱ्या लॉर्ड्स कसोटीत जसप्रीत बुमराहचे टीम इंडियामध्ये पुनरागमन निश्चित मानले जात आहे. त्यामुळे, लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर बुमराह आणि सिराज या दोघांचा सामना करणे इंग्लंडच्या फलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. बुमराह आणि सिराज या दोघांनाही आजवर लॉईसच्या मैदानावर प्रत्येकी एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.

बुमराहने येथे खेळलेल्या एका सामन्यातील दोन डावांमध्ये गोलंदाजी करताना ३७.३३ च्या सरासरीने एकूण ३ बळी मिळवले आहेत. दुसरीकडे, सिराजची आकडेवारी अधिक प्रभावी दिसते. सिराजने दोन डावांमध्ये गोलंदाजी करताना केवळ १५.७५ च्या उत्कृष्ट सरासरीने ८ बळी घेतले आहेत. सध्या सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सिराजला गोलंदाजीत विशेष यश मिळाले नव्हते, मात्र एजबॅस्टन कसोटीत त्याने आपल्या लय साधली आणि शानदार पुनरागमन करून एकूण ७ फलंदाजांना पॅव्हेलिपनचा रस्ता दाखवला होता.

दरम्यान, बुमराह आणि सिराज यांच्या व्यतिरिक्त, लॉर्ड्स कसोटीमध्ये तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून आकाश दीपचे संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. एजबॅस्टन कसोटीत आकाश दीपच कामगिरी अत्यंत प्रभावी ठरल होती, ज्यात त्याने एकूण १० बळ मिळवण्याची किमया साधली होती त्यामुळे लॉर्ड्सवर त्याची गोलंदाज कशी होते, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लॉर्ड्सवर भारताला केवळ ३ विजय


आतापर्यंत भारतीय संघाने लॉर्ड्सवर एकूण १९ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी केवळ ३ सामन्यांत विजय मिळवण्यात यश आले आहे, तर १२ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ४ सानने अनिर्णित राहिले आहेत.
Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या