गुजरातमध्ये पूल कोसळला; ३ मृत्यू, अनेकजण बेपत्ता


नदीत दोन ट्रक, एक बोलेरो आणि इतर काही वाहने पडली


अहमदाबाद : गुजरातमध्ये पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (आज) सकाळी आणंद आणि वडोदराला जोडणारा ४५ वर्षे जुना गंभीरा पूल कोसळला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. कोसळलेल्या पुलावर एक टँकर अडकला असून सुमारे पाच ते सहा वाहने नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी सोशल मीडियावर दुर्घटनेचा व्हिडीओ शेअर करत प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले.


त्यांनी म्हटले, "आणंद आणि वडोदरा जिल्ह्यांना जोडणारा मुख्य पूल कोसळला असून अनेक वाहने नदीत कोसळली आहेत. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू करून पर्यायी वाहतूक व्यवस्था उभारावी."


दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केले आहे. नदीत दोन ट्रक, एक बोलेरो आणि इतर काही वाहने पडली असून त्यामधील चालक व प्रवाशांचा शोध सुरु आहे.


स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मध्य गुजरातला सौराष्ट्राशी जोडणारा गंभीरा पूल सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळला. या अपघातात चार वाहने नदीत पडली असून, आतापर्यंत चार जणांना वाचवण्यात यश आले आहे.


राज्य सरकारने तातडीने बचावकार्य सुरू केले असून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे मोठ्या जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे, आणि प्रशासन अधिक जलद गतीने बचावकार्य राबवत आहे.


Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे