गुजरातमध्ये पूल कोसळला; ३ मृत्यू, अनेकजण बेपत्ता


नदीत दोन ट्रक, एक बोलेरो आणि इतर काही वाहने पडली


अहमदाबाद : गुजरातमध्ये पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (आज) सकाळी आणंद आणि वडोदराला जोडणारा ४५ वर्षे जुना गंभीरा पूल कोसळला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. कोसळलेल्या पुलावर एक टँकर अडकला असून सुमारे पाच ते सहा वाहने नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी सोशल मीडियावर दुर्घटनेचा व्हिडीओ शेअर करत प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले.


त्यांनी म्हटले, "आणंद आणि वडोदरा जिल्ह्यांना जोडणारा मुख्य पूल कोसळला असून अनेक वाहने नदीत कोसळली आहेत. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू करून पर्यायी वाहतूक व्यवस्था उभारावी."


दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केले आहे. नदीत दोन ट्रक, एक बोलेरो आणि इतर काही वाहने पडली असून त्यामधील चालक व प्रवाशांचा शोध सुरु आहे.


स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मध्य गुजरातला सौराष्ट्राशी जोडणारा गंभीरा पूल सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळला. या अपघातात चार वाहने नदीत पडली असून, आतापर्यंत चार जणांना वाचवण्यात यश आले आहे.


राज्य सरकारने तातडीने बचावकार्य सुरू केले असून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे मोठ्या जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे, आणि प्रशासन अधिक जलद गतीने बचावकार्य राबवत आहे.


Comments
Add Comment

आयएनएस 'अँड्रॉथ' भारतीय नौदलात दाखल, किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम

भारतीय नौदल किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम असेल नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमवारी विशाखापट्टणम

माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा; १००० गिर्यारोहक अडकले, बचावकार्य सुरू

नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच

बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले; मतदानाच्या तारखा जाहीर, कधी लागणार निकाल?

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल ७.४२ कोटी मतदार करणार