नवी मुंबई ते कल्याणपर्यंत प्रवास होणार सुस्साट

ठाण्यातील कटाई नाक्याला जोडणारा उन्नत मार्ग बांधणार


मुंबई (प्रतिनिधी): दररोज ठाण्यातील कटाई नाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावर प्रवास करणारे वाहनचालक खूप त्रस्त झाले आहेत. आता ही वाहतूक कोंडी सुटणार आहे. कटाई नाक्याला राष्ट्रीय महामार्ग-४ ला जोडणारा उन्नत रस्ता बांधणाऱ्या एमएमआरडीएने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे वन मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. ६.७१ किमी लांबीचा हा उन्नत मार्ग असणार आहे. हा उन्नत कॉरिडॉर करण्यामागचा उद्देश नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारेल. या ठिकाणी राहणाऱ्यांचा प्रवास सुसाट आणि ट्रैफिक मुक्त होईल. एमएमआरडीएने या उन्नत मार्गासाठी १९८२ कोटी रुपयांच्या किंमतीत अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला बांधकामाचे कंत्राट आधीच दिले आहे. सहा पदरी या उन्नत मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रादेशिक विकासाला लक्षणीय चालना मिळेल अशी आशा आहे.


एमएमआरडीएच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वन मंजुरीचा प्रस्ताव नुकताच मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्यातील कटाई जंक्शनला एनएच-४ म्हणजे मुंबई-पुणे महामार्ग जोडणारा लिंक रोड बांधण्यासाठी अंदाजे ०.८३२५ हेक्टर खारफुटीची जमीन वळवावी लागेल. एमएमआरडीएने पर्यावरण मंत्रालयाला दिलेल्या प्रस्तावातअसे म्हटले आहे की, 'गेल्या काही दशकांमध्ये शहराची लोकसंख्या वाढली आहे. सध्याच्या पायाभूत सुविधांवर खूप ताण आहे. गर्दीच्या वेळी महत्त्वाच्या चौकांमध्ये रस्ते अडवणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. याचा व्यवसाय आणि व्यापारावर अप्रत्यक्ष नकारात्मक परिणाम होतो."


अफकॉन्स सध्या या उन्नत कॉरिडॉरचे डिझाइन आणि बांधकाम करत आहे. ज्यामध्ये ६ किलो मीटरचा व्हायाडक्ट, डीएफसीसीआयएल कॉरिडॉरवर १०० मीटरचा रेल्वे ओव्हरब्रिज, १.५८ किलो मीटरचा प्रवेश रॅम्प आणि ६.३२ किमीचे सेवा रस्ते यांचा समावेश आहे. या एकात्मिक प्रकल्पामुळे ऐरोली ते कटाई नाकापर्यंत कनेक्टिव्हिटी सुधारेल. ज्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ कमी होईल आणि या प्रदेशातील वाहतूक सुरळीत होईल.


सध्या प्रवासी अनेकदा महापे मार्गे शिळफाटा येथे पोहोचण्यासाठी आणि नंतर कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि इतर भागात जाण्यासाठी लांब मार्गाचा वापर करतात. या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण वाढत असल्याने प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने एनएच-४ ते कटाई नाक्यापर्यंत (कल्याण-शील रोडवरील टोल नाक्याजवळ) बेट उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. हा रस्ता तयार झाल्यानंतर नवी मुंबईत ते कल्याणपर्यंतचा प्रवास सुस्साट होईल.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू

Tree Adoption Scheme : मुंबईत राबवली जाणार वृक्ष दत्तक योजना; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नागरिक गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून आणि