नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबर अखेरीस टेक ऑफ,उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिल्या टप्प्याचे उद्द्घाटन येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधानसभेत केली. हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे विमानतळ असून एकाचवेळी ३५० विमाने या विमानतळावर उभी करता येतील एवढी क्षमता याची आहे. तसेच वर्षाला सुमारे ९ कोटी प्रवासी हवाई वाहतुकीचा आनंद यामुळे घेऊ शकतील, अशी माहितीही त्यांनी मावेळी दिली. या विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होत आला असून त्याचे उ‌द्घाटन सप्टेंबरअखेरीस केले जाणार आहे.

नवी मुंबई विमानतळ नेमके कधी सुरू होणार? याबद्दल प्रश्न विचारले जात होते. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली की, येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नवी मुंबई विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होणार होता. बहुतांश कामे पूर्ण झाली असून किरकोळ कामे येत्या दोन महिन्यात अंतिम केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर २०२९ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा २०३२ पर्यंत आणि चौथा टप्पा २०३६ पर्यंत पूर्ण होईल, असे बोलले जात आहे.

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ महाराष्ट्रात उभारले जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दुसऱ्या क्रमांकांचे विमानतळ उभारले जात आहे. नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने बोडले जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. तसंच, नवी मुंबईच्या विमानतळाला मेट्रो, लोकल, बस आणि खासगी वाहनांसोबत जोडण्यात येईल.
Comments
Add Comment

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी क्षेत्रातील जागतिक आणि गुंतवणूक शिखर परिषद महाराष्ट्रात

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी,

१२ फेब्रुवारी रोजी भारत बंद; शाळा, महाविद्यालय, कार्यालय... जाणून घ्या या दिवशी काय सुरु अन् काय बंद ?

मुंबई : विविध कामगार संघटनांनी १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम

मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त

शिवसेनेच्या खासदारांनी घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची भेट

नवी दिल्ली :  भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची आज दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय

Devendra Fadanvis : 'अस्सल मराठी चेहरा आणि दांडगा अनुभव'; रितू तावडेंच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; बाळासाहेबांना ज्या प्रकारचं...

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सर्वोच्च पदी अखेर भाजपच्या रितू

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची अनिवार्यता --- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली