टेक वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा धक्कातंत्र! जॅक डोर्सीचं 'बिटचॅट' अ‍ॅप लॉन्च; इंटरनेट, नेटवर्कशिवाय मेसेजिंग शक्य

  24

मुंबई : ट्विटर आणि ब्लॉकचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी एक क्रांतिकारी 'बिटचॅट' अ‍ॅप आणले आहे . या अ‍ॅपची खास गोष्ट म्हणजे हे इंटरनेट, मोबाईल नेटवर्क, फोन नंबर किंवा ईमेलशिवाय मेसेजिंग करण्याची सुविधा देतं.

जगभरातील युजर्सना सोशल मीडिया, चॅटिंगसाठी सतत इंटरनेटची गरज भासते. पण आता जॅक डोर्सीच्या नवीन प्रोजेक्टमुळे हे समीकरण बदलणार आहे. 'बिटचॅट' हे एक डिसेंट्रलाइज्ड, प्रायव्हसी-केंद्रित मेसेजिंग अ‍ॅप असून ते ब्लूटूथ लो एनर्जी (बीएलई) तंत्रज्ञानावर आधारित आहे.

काय आहे 'बिटचॅट' ?


'बिटचॅट' हे एक पीअर-टू-पीअर चॅटिंग अ‍ॅप आहे. यामध्ये कोणताही केंद्रीय सर्व्हर नसतो. यामुळे सेन्सॉरशिप किंवा इंटरनेट बंदीमुळे अ‍ॅपवर परिणाम होत नाही. मोबाईल नंबर, ईमेल याचीही आवश्यकता नसते, ज्यामुळे प्रयोगकर्त्यांची गोपनीयता अधिक सुरक्षित राहते.

हे अ‍ॅप कसं काम करतं?


ब्लूटूथ मेश नेटवर्क वापरून हे अ‍ॅप जवळच्या डिव्हाइसेसना कनेक्ट करतं.

एक डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला थेट मेसेज पाठवतो.

मल्टी-हॉप सिस्टमद्वारे लांब अंतरावरील मेसेज दुसऱ्या डिव्हाइसेसद्वारे फॉरवर्ड होतो.

मेसेज रिसिव्हरपर्यंत पोहोचेपर्यंत तात्पुरत्या मेमरीत स्टोअर होतो.

300 मीटरपेक्षा जास्त अंतरावर देखील हे नेटवर्क कार्यरत राहतं.

सुरक्षा आणि प्रायव्हसी बाबतीत कितपत विश्वासार्ह?

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन : कर्व्ह 25519 आणि एईएस-जीसीएम अल्गोरिदमचा वापर.

कोणताही फोन नंबर किंवा ईमेलची गरज नाही.

कोणताही सर्व्हर नाही, त्यामुळे अ‍ॅप पूर्णपणे डिसेंट्रलाइज्ड आणि सुरक्षित.

सध्या कुठे उपलब्ध आहे?


'बिटचॅट' सध्या अ‍ॅपल टेस्टफ्लाइट वर आयओएस युजर्ससाठी बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. लवकरच अँड्रॉइड आणि इतर प्लॅटफॉर्मसाठीही ते लॉन्च करण्यात येईल.

जॅक डोर्सीचा हा 'वीकेंड प्रोजेक्ट' असला तरी, 'बिटचॅट' चं तंत्रज्ञान आणि संकल्पना भविष्यातील इंटरनेट-मुक्त संवादाच्या क्रांतीकडे मोठं पाऊल ठरू शकतं.
Comments
Add Comment

Bharat Bandh News : उद्या भारत बंदची मोठी घोषणा, शाळा, बँका... काय काय बंद राहणार?

२५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार नवी दिल्ली : बँका, विमा, टपाल, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील अंदाजे

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेत विक्रमी गर्दी;  ९३ हजार भाविकांनी घेतले दर्शन

जम्मू: पवित्र अमरनाथ यात्राला दि. ३ जुलैपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या ५ दिवसांतच येथे येणाऱ्या भाविकांची

अंधश्रद्धेतून कुटुंबाची हत्या; जादू-टोण्याच्या संशयातून ५ जणांना जाळले!

पूर्णिया : बिहारच्या पूर्णिया येथे एकाच कुटुंबातील ५ जणांची जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती. अंधश्रद्धेतून

अमेरिकेत फिरायला गेलेल्या हैदराबादमधील एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू

वॉशिंग्टन : अमेरिकेत फिरायला गेलेल्या एका हैदराबादी कुटुंबातील आई-वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा नवी दिल्ली: महाराष्ट्रातील शेतकरी मोठया प्रमाणावर कांदा पिकाचे

Tahawwur Rana : हो, २६/११ हल्ला झाला तेव्हा मी पाकिस्तानचा विश्वासू एजंट होतो... मास्टरमाइंड तहव्वुर राणाची कबुली

मुंबई: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.