टेक वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा धक्कातंत्र! जॅक डोर्सीचं 'बिटचॅट' अ‍ॅप लॉन्च; इंटरनेट, नेटवर्कशिवाय मेसेजिंग शक्य

मुंबई : ट्विटर आणि ब्लॉकचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी एक क्रांतिकारी 'बिटचॅट' अ‍ॅप आणले आहे . या अ‍ॅपची खास गोष्ट म्हणजे हे इंटरनेट, मोबाईल नेटवर्क, फोन नंबर किंवा ईमेलशिवाय मेसेजिंग करण्याची सुविधा देतं.

जगभरातील युजर्सना सोशल मीडिया, चॅटिंगसाठी सतत इंटरनेटची गरज भासते. पण आता जॅक डोर्सीच्या नवीन प्रोजेक्टमुळे हे समीकरण बदलणार आहे. 'बिटचॅट' हे एक डिसेंट्रलाइज्ड, प्रायव्हसी-केंद्रित मेसेजिंग अ‍ॅप असून ते ब्लूटूथ लो एनर्जी (बीएलई) तंत्रज्ञानावर आधारित आहे.

काय आहे 'बिटचॅट' ?


'बिटचॅट' हे एक पीअर-टू-पीअर चॅटिंग अ‍ॅप आहे. यामध्ये कोणताही केंद्रीय सर्व्हर नसतो. यामुळे सेन्सॉरशिप किंवा इंटरनेट बंदीमुळे अ‍ॅपवर परिणाम होत नाही. मोबाईल नंबर, ईमेल याचीही आवश्यकता नसते, ज्यामुळे प्रयोगकर्त्यांची गोपनीयता अधिक सुरक्षित राहते.

हे अ‍ॅप कसं काम करतं?


ब्लूटूथ मेश नेटवर्क वापरून हे अ‍ॅप जवळच्या डिव्हाइसेसना कनेक्ट करतं.

एक डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला थेट मेसेज पाठवतो.

मल्टी-हॉप सिस्टमद्वारे लांब अंतरावरील मेसेज दुसऱ्या डिव्हाइसेसद्वारे फॉरवर्ड होतो.

मेसेज रिसिव्हरपर्यंत पोहोचेपर्यंत तात्पुरत्या मेमरीत स्टोअर होतो.

300 मीटरपेक्षा जास्त अंतरावर देखील हे नेटवर्क कार्यरत राहतं.

सुरक्षा आणि प्रायव्हसी बाबतीत कितपत विश्वासार्ह?

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन : कर्व्ह 25519 आणि एईएस-जीसीएम अल्गोरिदमचा वापर.

कोणताही फोन नंबर किंवा ईमेलची गरज नाही.

कोणताही सर्व्हर नाही, त्यामुळे अ‍ॅप पूर्णपणे डिसेंट्रलाइज्ड आणि सुरक्षित.

सध्या कुठे उपलब्ध आहे?


'बिटचॅट' सध्या अ‍ॅपल टेस्टफ्लाइट वर आयओएस युजर्ससाठी बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. लवकरच अँड्रॉइड आणि इतर प्लॅटफॉर्मसाठीही ते लॉन्च करण्यात येईल.

जॅक डोर्सीचा हा 'वीकेंड प्रोजेक्ट' असला तरी, 'बिटचॅट' चं तंत्रज्ञान आणि संकल्पना भविष्यातील इंटरनेट-मुक्त संवादाच्या क्रांतीकडे मोठं पाऊल ठरू शकतं.
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला