नाशिक महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 'कट': मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश!


मुंबई: नाशिक महानगरपालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कंत्राटदार पैसे काढून घेत असल्याचा गंभीर आरोप आज विधानसभेत करण्यात आला. आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. गरिबांच्या श्रमावर डल्ला मारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.



आमदार देवयानी फरांदेंचा आरोप


आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत प्रश्न विचारला की, "नाशिक महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पैशांतून कंत्राटदार पैसे काढून घेत आहेत. काही अधिकारी आणि कंत्राटदार संगनमत करून त्यांच्या पगारातून पैसे घेत आहेत. गरिबांच्या पगारातून पैसे काढण्याचं हे प्रमाण खूप जास्त आहे. यावर सरकार काय आणि कधी कारवाई करणार?"



मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश आणि कठोर कारवाईचे संकेत


या गंभीर आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष घालणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, "नाशिक महापालिकेशी संबंधित या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकारी चौकशी करतील. यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट केले जाईल."


मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, "कंत्राटदार पैसे देत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता यापुढे कामगार विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. कामगारांना दिलेले पैसे जर कोणी घेतले, तर तो फौजदारी गुन्हा मानला जाईल. तसेच, सात-आठ वर्षे पीएफभरणाऱ्या कंत्राटदारांनाही काळ्या यादीत टाकले जाईल."


या घोषणेमुळे नाशिक महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर गैरव्यवहार करणाऱ्यांवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, हे स्पष्ट झाले आहे.


Comments
Add Comment

Violent clash at Gurudwara in Germany : जर्मनीतील गुरुद्वारात दोन गटांमध्ये हिंसक झटापट, ११ जण जखमी

जर्मनीतील मोर्स शहरातील ड्यूसबर्ग भागात असलेल्या एका गुरुद्वारात दोन गटांमध्ये अचानक हिंसक झटापट झाली. या

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिणची धुरा

- महाराष्ट्र भाजपकडून जिल्हानिहाय प्रभारी जाहीर मुंबई : संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र भाजपने

CM Devendra Fadnavis : 'अर्बन नक्षलवाद’ आणि अराजकता पसरवणाऱ्या शक्तींना युवाशक्तीच रोखणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

- भाजयुमोच्या ‘युवाशक्ती जागर यात्रे’चा प्रारंभ मुंबई : राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि

Mumbai 3.0 : अटल सेतू ते पुणे द्रुतगती जोडमार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार

- ‘मुंबई ३.०’साठी कनेक्टिव्हिटीचे जाळे; जोडमार्गाचे अभियांत्रिकी टप्पे पूर्णत्वाकडे मुंबई : मुंबई आणि पुणे या

Navi Mumbai- Panvel : नवी मुंबई–पनवेलमध्ये अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यातून दिलासा, पण नागरिकांची तारांबळ

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांना आज

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.