नाशिक महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 'कट': मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश!


मुंबई: नाशिक महानगरपालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कंत्राटदार पैसे काढून घेत असल्याचा गंभीर आरोप आज विधानसभेत करण्यात आला. आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. गरिबांच्या श्रमावर डल्ला मारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.



आमदार देवयानी फरांदेंचा आरोप


आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत प्रश्न विचारला की, "नाशिक महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पैशांतून कंत्राटदार पैसे काढून घेत आहेत. काही अधिकारी आणि कंत्राटदार संगनमत करून त्यांच्या पगारातून पैसे घेत आहेत. गरिबांच्या पगारातून पैसे काढण्याचं हे प्रमाण खूप जास्त आहे. यावर सरकार काय आणि कधी कारवाई करणार?"



मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश आणि कठोर कारवाईचे संकेत


या गंभीर आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष घालणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, "नाशिक महापालिकेशी संबंधित या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकारी चौकशी करतील. यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट केले जाईल."


मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, "कंत्राटदार पैसे देत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता यापुढे कामगार विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. कामगारांना दिलेले पैसे जर कोणी घेतले, तर तो फौजदारी गुन्हा मानला जाईल. तसेच, सात-आठ वर्षे पीएफभरणाऱ्या कंत्राटदारांनाही काळ्या यादीत टाकले जाईल."


या घोषणेमुळे नाशिक महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर गैरव्यवहार करणाऱ्यांवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, हे स्पष्ट झाले आहे.


Comments
Add Comment

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये