कबुतरखाना बंद करण्यासाठी महापालिका अ‍ॅक्शन मोडवर, दाणे टाकणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड

मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्य सरकारने मुंबईतील ५१ कबुतर खान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर सोमवारी जीपीओ समोरील पाणपाईच्या जागेत निर्माण झालेल्या कबुतर खान्यामध्ये कबुतरांना खाण्यास दाणे टाकणाऱ्यांविरोधात धडक कारवाई हाती घेतली. कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला असून ही कारवाई देहाच्या स्वरुपात्त पैसे गोळा करण्यासाठी नसून नागरिकांमध्ये भीती निर्माण व्हावो याच दृष्टिकोनातून केल्याचे बोलले जात आहे. मात्र, एकीकडे महापालिकेच्या ए विभागाच्यावतीने ही कारवाई केली जात असतानाच दादर कबुतर खान्यामध्ये चक्क कबुतरांना दाणे टाकण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याने याठिकाणचा कबुतरखाना बंद करण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही दिसून येत नाही. दरम्यान, उपद्रवशोधकांची पदे रिक्त असल्याने यावर कारवाई कुणी करायची हा मोठा प्रश्न आता महापालिकेपुढे आहे.


कबुतरांची विष्ठा मानवी आरोग्यास घातक असल्याने मुंबईतील कबुतरांना खाणे देणारी ठिकाण बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. मुंबई आणि कबूतर यांची एक वेगळी ओळख आहे आणि मुंबईतील अनेक भागांमध्ये कबुतर खाने आहे. मुंबईत अशाप्रकारे ५१ कबुतर खाने असून सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर तसेच निर्देशानुसार शुक्रवारी महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने दादर कबुतरखान्यावरील छप्पर आणि तेथील साहित्य जप्त केले आणि या कबुतर खान्याची स्वच्छता केली. शुक्रवारी या कचुतर खान्याची स्वच्छता केल्यानंतर शनिवार पासून पुन्हा एकदा पक्षीप्रेमी तथा कबुतर प्रेमी हे भूतदयेपोटी तसेच पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी टाकण्यासाठी दाणे टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे याठिकाणी पुन्हा कबुतर खान्यातील कबुतरांचा बाबर सुरु झाला आहे.


एका बाजुला दादरमधील कबुतर खाना बंद करण्याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाली सुरु नसतानाच दुसरीकडे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्य पोस्ट कार्यालयाच्यासमोरील पाणपोईच्या ठिकाणी असलेल्या कबुतरखान्याच्या जागी कबुतरांना दाणे खायला घालण्याविरोधात धडक कारवाई हाती घेतली. या कबुतर खान्याच्या ठिकाणी कबुतरांना खाद्य खायला देणान्यांना पाचशे रुपांचा दंड आकारला आहे. याठिकाणी सकाळी बबलू वर्मा यांना दाणे खायला घातल्याबद्दल ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच प्रत्येक व्यक्तीला दाणे न टाकण्याचे आवाहन केले. त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी चा कबुतरखान्यात दाणे खायला घालू नये असे आवाहनच महापालिकेच्यावतीने केले आहे. दरम्यान, जैन तसेच गुजराती धर्मिय तसेच त्यांच्या संस्थांकडून महापालिकेला निवेदन प्राप्त होत असून या कबुतर खान्पांवर कारवाई न करण्याची विनंती केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेने हा निर्णय घेतला असला तरी संस्थांच्या विनंतीनंतर महापालिका काय निर्णय घेते याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local Train Fire : ब्रेकिंग : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकलच्या डब्याने घेतला पेट; विद्याविहारहून CSMT कडे जाणारी 'स्लो' लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर आज ऐन गर्दीच्या वेळी एक थरारक घटना घडली. कुर्ला आणि

राज्यात १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

मुंबई  : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. १५ जानेवारी रोजी २९ महापालिकेसाठी

ईव्हीएम सुसज्ज करण्याच्या कामाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून पाहणी

मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज विल्सन महाविद्यालयास भेट देऊन बृहन्मुंबई महानगरपालिका

पाणंद रस्ते समितीत सह अध्यक्षांसह परिषद सदस्य अन पाच प्रगतशील शेतकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय योजना प्रभावी करण्याचे चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांचे

धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले....

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे वडिलांनी आपल्याच मुलांना

Ambarnath News : अंबरनाथचे काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपच्या वाटेवर; मोठी खळबळ

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.