महिला मतदारांनी लेखी निवेदन दिल्यास 'दारूबंदी'


खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई : खारघर परिसरात प्रभागाकरिता दारूबंदी करण्याबाबत विहित प्रक्रियेनुसार निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


खारघर परिसरातील दारू विक्री परवाना रद्द करून दारूमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार विधानसभेत बोलत होते.


सन २००८ व २००९ च्या अधिसूचनेनुसार नगरपरिषद/महानगरपालिका क्षेत्रातील एखाद्या प्रभागातील २५ टक्के पेक्षा कमी नसलेल्या महिला मतदार किंवा एकूण मतदारांनी लेखी निवेदन दिल्यास संबंधित जिल्हाधिकारी यथास्थिती गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. जर संबंधित प्रभागातील एकूण मतदार किंवा महिला मतदारांच्या संख्येच्या किमान ५० टक्केपेक्षा अधिक अनुक्रमे एकूण मतदार किंवा महिला मतदार यांनी मद्य विक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्याच्या बाजूने मतदान केल्यास त्या क्षेत्रात मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येतात, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.


उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत किंवा महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर अनुज्ञप्ती संदर्भात कोणती कार्यवाही करावी यासंदर्भात शासनाने वेळोवेळी नियमांमध्ये बदल केले आहेत. १९७२ पासून राज्यात नवीन अनुज्ञप्तीची परवानगी देण्यात येत नाही. तथापि, विहित कार्यपद्धतीनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यास परवानगी देण्यात येते.


मद्य विक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्यासंदर्भात नगरपालिका किंवा महानगरपालिकेतील उपस्थित नागरिकांच्या नव्हे तर एकूण मतदारांच्या ५० टक्के पेक्षा अधिक अनुक्रमे एकूण मतदार किंवा महिला मतदारांचा निर्णय विचारात घेतला जाईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभा सदस्य अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यास उत्तर देताना स्पष्ट केले.


Comments
Add Comment

Asha Bhosle : राज्यात स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार - आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्रातील गायन-संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम

Girish Mahajan : 'गरज असेल तरच घराबाहेर पडा!' मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांचे नागरिकांना मोठे आवाहन

मुंबई : राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस सुरू आहे. विशेषतः मुंबईत

ST NCMC Card : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा जबरदस्त प्रतिसाद; ६२.८६ लाखांनी केली नोंदणी

- १ ऑगस्टपासून मोठा बदल मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC)

Sakinaka Manhole Accident : मोबाईलवर बोलणं जीवावर बेतलं! साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसादरम्यान साकीनाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. खैराणी रोडवरील सन्मान

Shivsena Amey Ghole : मुंबईकरांच्या मदतीसाठी शिवसेना सज्ज; गटनेते अमेय घोले यांनी दिले महत्वाचे निर्देश

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे कोसळणे, वाहतूक कोंडी, वीजपुरवठा खंडित

Rain Alerts : हवामान खात्याचा रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : जून महिना जवळपास कोरडाच गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली.