पुण्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ

पुणे : पुणे शहरातील डेंग्यूचे रूग्ण वाढत असून, डासांचा वाढता डंख पुणेकरांच्या आरोग्याची डोकेदुखी वाढवत आहे. गेल्या पाच महिन्यांत जेवढे डेंग्यू रूग्णसंख्या नोंदवली, तेवढी संख्या एकट्या जूनमध्ये नोंदवली. यामुळे नागरिकांनी डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करावी, स्वच्छता पाळावी असे आवाहन पालिकेने केले आहे.


पावसाळा सुरू होताच साथीचे आजार डोके वर काढतात. सर्दी, खोकला, ताप, घसा आदी आजारांनी नागरिक हैराण होतात. त्यातच डेंग्युच्या डासांची पैदासही वाढते. पावसामुळे सोसायटी, गोडाऊन, पडकी घरांसह अन्यत्र पाणी साचून डासांची पैदास वाढू लागते. एडिस इजिप्ती या डासांपासून डेंग्यू होण्याची भीती अधिक असते.


जानेवारी २०२५ मध्ये पालिका कार्यक्षेत्रात डेंग्युचे ३९ रूग्ण आढळले. फेब्रुवारीत ३१ रूग्ण सापडले. त्यानंतर पुढील तीन महिने उन्हाळ्यामुळे रूग्णसंख्या काहीशी घटली. यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली आणि जून महिन्यात डेंग्यू रूग्णांची संख्या १२३ वर पोहचली.जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ११ नवीन डेंग्यूचे रूग्ण सापडले. गेल्या आठवड्यात चिकनगुनिय़ाचे दोन संशयीत रूग्ण सापडले. त्यामुळे लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे, असे आवाहन पालिका सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ.राजेश दिघे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु