Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेत विक्रमी गर्दी;  ९३ हजार भाविकांनी घेतले दर्शन

  32

जम्मू: पवित्र अमरनाथ यात्राला दि. ३ जुलैपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या ५ दिवसांतच येथे येणाऱ्या भाविकांची संख्या ९३,३३६ वर पोहोचली आहे.  दरम्यान सोमवार ७ जुलै हा यात्रेतील सर्वात गर्दीचा दिवस ठरला आहे. दरम्यान, ८,६०५ यात्रेकरूंची सहावी तुकडी सोमवारी जम्मूहून गंदरबलमधील बालटाल आणि पहलगाममधील नुनवान बेस कॅम्पसाठी रवाना झाली. ३८ दिवसांची ही यात्रा पहलगाम आणि बालटाल दोन्ही मार्गांवरून निघेल. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल. गेल्या वर्षी ही यात्रा ५२ दिवस चालली आणि ५ लाख भाविकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले.

अमरनाथ यात्रेच्या पाचव्या दिवशी २३,८५७ भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. आतापर्यंत एकाच दिवसात दर्शन घेणाऱ्या भाविकांची ही सर्वात मोठी संख्या आहेयात्रेच्या पहिल्या दिवशी, गुरुवारी १२,३४८ यात्रेकरू, शुक्रवारी १४,५१५, शनिवारी २१,१०९ आणि रविवारी २१,५१२ यात्रेकरू दर्शनासाठी आले होते.  भेट दिलेल्या यात्रेकरूंमध्ये १७,२५७ पुरुष, ५,२९७ महिला, ३४१ मुले, २९६ साधू, ९ ट्रान्सजेंडर भक्त आणि ६२५ सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे.

अनुकूल हवामान, कार्यक्षम व्यवस्था आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि सुरक्षा संस्थांकडून मिळालेल्या चांगल्या सहाय्यामुळे संख्येत वाढ झाली आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, यावर्षी जम्मू विभागात वार्षिक अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्याएकूण १८० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ३ जुलैपासून सुरू झालेली ३८ दिवसांची ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी संपणार आहे.
Comments
Add Comment

टेक वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा धक्कातंत्र! जॅक डोर्सीचं 'बिटचॅट' अ‍ॅप लॉन्च; इंटरनेट, नेटवर्कशिवाय मेसेजिंग शक्य

मुंबई : ट्विटर आणि ब्लॉकचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी एक क्रांतिकारी 'बिटचॅट' अ‍ॅप आणले आहे . या अ‍ॅपची खास गोष्ट

Bharat Bandh News : उद्या भारत बंदची मोठी घोषणा, शाळा, बँका... काय काय बंद राहणार?

२५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार नवी दिल्ली : बँका, विमा, टपाल, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील अंदाजे

अंधश्रद्धेतून कुटुंबाची हत्या; जादू-टोण्याच्या संशयातून ५ जणांना जाळले!

पूर्णिया : बिहारच्या पूर्णिया येथे एकाच कुटुंबातील ५ जणांची जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती. अंधश्रद्धेतून

अमेरिकेत फिरायला गेलेल्या हैदराबादमधील एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू

वॉशिंग्टन : अमेरिकेत फिरायला गेलेल्या एका हैदराबादी कुटुंबातील आई-वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा नवी दिल्ली: महाराष्ट्रातील शेतकरी मोठया प्रमाणावर कांदा पिकाचे

Tahawwur Rana : हो, २६/११ हल्ला झाला तेव्हा मी पाकिस्तानचा विश्वासू एजंट होतो... मास्टरमाइंड तहव्वुर राणाची कबुली

मुंबई: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.