Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेत विक्रमी गर्दी;  ९३ हजार भाविकांनी घेतले दर्शन

  62

जम्मू: पवित्र अमरनाथ यात्राला दि. ३ जुलैपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या ५ दिवसांतच येथे येणाऱ्या भाविकांची संख्या ९३,३३६ वर पोहोचली आहे.  दरम्यान सोमवार ७ जुलै हा यात्रेतील सर्वात गर्दीचा दिवस ठरला आहे. दरम्यान, ८,६०५ यात्रेकरूंची सहावी तुकडी सोमवारी जम्मूहून गंदरबलमधील बालटाल आणि पहलगाममधील नुनवान बेस कॅम्पसाठी रवाना झाली. ३८ दिवसांची ही यात्रा पहलगाम आणि बालटाल दोन्ही मार्गांवरून निघेल. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल. गेल्या वर्षी ही यात्रा ५२ दिवस चालली आणि ५ लाख भाविकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले.

अमरनाथ यात्रेच्या पाचव्या दिवशी २३,८५७ भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. आतापर्यंत एकाच दिवसात दर्शन घेणाऱ्या भाविकांची ही सर्वात मोठी संख्या आहेयात्रेच्या पहिल्या दिवशी, गुरुवारी १२,३४८ यात्रेकरू, शुक्रवारी १४,५१५, शनिवारी २१,१०९ आणि रविवारी २१,५१२ यात्रेकरू दर्शनासाठी आले होते.  भेट दिलेल्या यात्रेकरूंमध्ये १७,२५७ पुरुष, ५,२९७ महिला, ३४१ मुले, २९६ साधू, ९ ट्रान्सजेंडर भक्त आणि ६२५ सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे.

अनुकूल हवामान, कार्यक्षम व्यवस्था आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि सुरक्षा संस्थांकडून मिळालेल्या चांगल्या सहाय्यामुळे संख्येत वाढ झाली आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, यावर्षी जम्मू विभागात वार्षिक अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्याएकूण १८० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ३ जुलैपासून सुरू झालेली ३८ दिवसांची ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी संपणार आहे.
Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )