युजवेंद्र चहलने आरजे महावशसोबतच्या त्याच्या नात्याबाबत चाहत्यांना दिली हिंट

मुंबई : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्री वर्मासोबत घटस्फोट घेतल्यानंतर चहलचं नाव आरजे महावशसोबत जोडलं जात आहे. आयपीएलदरम्यान आरजे महावश चहलला चीअर अप करताना दिसली.त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा रंगल्या. याबाबत दोघांनी ऑफिशियल काहीच सांगितलं नाही. मात्र, आता चहलने कपिल शर्माच्या शोमध्ये आरजे महावशसोबतच्या त्याच्या नात्याबाबत हिंट दिली आहे.


युजवेंद्र चहलने नुकतीच कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली होती. त्याच्यासोबत गौतम गंभीर, ऋषभ पंत आणि अभिषेक शर्मादेखील होते. या शोमध्ये कलाकारांनी चहलची फिरकी घेतली. अभिनेता किकूने मुलीच्या गेटअपमध्ये येत चहललला विचारले, "तुझ्या शर्टवर लिपस्टिकचा डाग का आहे? हे काय चाललंय चहलजी? ती कोण आहे? देशाला जाणून घ्यायचं आहे". त्यावर चहल म्हणाला, "आता संपूर्ण देशाला माहीत आहे". चहलच्या या वक्तव्यामुळे तो आरजे महावशसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.


दरम्यान, युजवेंद्र चहल त्याच्या खेळीने मैदान गाजवतो. चहलने २०२०मध्ये धनश्री वर्मासोबत लग्न करत संसार थाटला होता. लॉकडाऊनमध्ये त्यांची ओळख झाली होती. नंतर काही वेळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, लग्नानंतर ५ वर्षांनी घटस्फोट घेत ते आता वेगळे झाले आहेत.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.