युजवेंद्र चहलने आरजे महावशसोबतच्या त्याच्या नात्याबाबत चाहत्यांना दिली हिंट

  35

मुंबई : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्री वर्मासोबत घटस्फोट घेतल्यानंतर चहलचं नाव आरजे महावशसोबत जोडलं जात आहे. आयपीएलदरम्यान आरजे महावश चहलला चीअर अप करताना दिसली.त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा रंगल्या. याबाबत दोघांनी ऑफिशियल काहीच सांगितलं नाही. मात्र, आता चहलने कपिल शर्माच्या शोमध्ये आरजे महावशसोबतच्या त्याच्या नात्याबाबत हिंट दिली आहे.


युजवेंद्र चहलने नुकतीच कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली होती. त्याच्यासोबत गौतम गंभीर, ऋषभ पंत आणि अभिषेक शर्मादेखील होते. या शोमध्ये कलाकारांनी चहलची फिरकी घेतली. अभिनेता किकूने मुलीच्या गेटअपमध्ये येत चहललला विचारले, "तुझ्या शर्टवर लिपस्टिकचा डाग का आहे? हे काय चाललंय चहलजी? ती कोण आहे? देशाला जाणून घ्यायचं आहे". त्यावर चहल म्हणाला, "आता संपूर्ण देशाला माहीत आहे". चहलच्या या वक्तव्यामुळे तो आरजे महावशसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.


दरम्यान, युजवेंद्र चहल त्याच्या खेळीने मैदान गाजवतो. चहलने २०२०मध्ये धनश्री वर्मासोबत लग्न करत संसार थाटला होता. लॉकडाऊनमध्ये त्यांची ओळख झाली होती. नंतर काही वेळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, लग्नानंतर ५ वर्षांनी घटस्फोट घेत ते आता वेगळे झाले आहेत.

Comments
Add Comment

एजबेस्टनमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

बर्मिंगहॅम : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. हेडिंग्लेच्या पहिल्या कसोटीत चांगला

IND vs ENG: शुभमनची जबरदस्त फटकेबाजी, मोहम्मद-आकाशदीपची कमाल

मुंबई : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. लीड्सच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करूनही

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

IND Vs ENG Test Match Day 5: एजबॅस्टन कसोटी सामन्यात पावसामुळे पाचव्या दिवशी खेळण्यास विलंब...

पावसामुळे भारताच्या विजयाच्या आशा धूसर होण्याची शक्यता एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच

राजकारणाची क्रिकेटवर मात

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका पुढे ढकलली मुंबई : भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता. तिथे