Thackeray Brothers VS BJP : दोन काय चार भाऊ एकत्र आले तरी आम्ही तयार, भाजपच्या प्रसाद लाड यांचं ठाकरे बंधूंना खुले आव्हान

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना दिसत आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीच्या गोटातून प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत लाडके आणि आदरणीय असलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भाजपच्या नेत्यांनी प्रत्युत्तर द्यायला आणि जाब विचारायला सुरुवात केली होती. यामध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) हे आघाडीवर आहेत. त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना (Thackeray Brothers) डिवचत आमनेसामनेच्या लढाईचे आव्हान दिले आहे. प्रसाद लाड आज विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.



आम्ही वाटच बघतोय...


प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना ललकारत समोरासमोरच्या लढाईचे आव्हान दिले. आम्ही वाटच बघतोय, दोन भाऊ एकत्र येऊ द्या, होऊ द्या महासंग्राम. दोन भाऊ काय पुतणे, भाचे आणि अजून चार भाऊ हे सगळे एकत्र येऊ द्या, आम्ही तयार आहोत. विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणात फरक होता. उद्धव ठाकरे मराठीबद्दल काय बोलले, सगळं मराठी सोडून 'गद्दा'र, 'धोका', 'खंजीर' हे शब्द त्यांनी भाषणात वापरले, असे प्रसाद लाड यांनी म्हटले.



उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना सोबत घेत आहेत. पण ज्याप्रकारे उद्धव यांनी राज ठाकरे यांचा अपमान केला होता. या सगळ्याबद्दल उद्धव ठाकरे हे राज यांची माफी मागणार का?, असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे तयार आहोत. मराठी भाषेबद्दल सगळ्यांना अभिमान आहे. मराठी भाषेत बोललं पाहिजे, पण एखाद्याला मराठी येत नसेल हिंदी भाषिकांना मराठी बोलण्याची दादागिरी करून त्याला मारहाण करणं हे योग्य नाही, असे मतही प्रसाद लाड यांनी मांडले. यावर आता मनसे आणि ठाकरे गटाचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा