मुंबईतील ५१ कबुतरखान्यांवर बंदी

मुंबई : मुंबईची ओळख असलेले सर्व 'कबुतर खाने' आता बंद होणार आहेत. मुंबई आणि कबुतर खाने हे एक जुनं समीकरण. मात्र आता राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला मुंबईतल्या ५१  कबुतर खान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. काय आहेत या मागची नेमकी कारणं? राज्य सरकारने असा का घेतला निर्णय ? जाणून घ्या सविस्तर माहिती..



देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि कबुतरं यांचं अनोखं असं नातं आहे. मात्र महाराष्ट्र सरकारनं मुंबई महानगरपालिकेला शहरातील सर्व 51 कबुतरखाने तातडीने बंद करण्याचे आदेश दिले. या मागचे कारण आहे कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे होणारे गंभीर आजार. शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार, दमा, फुफ्फुसांचे दीर्घकालीन गंभीर आजार होऊ शकतात, असा मुद्दा कायंदे यांनी मांडला. यावर कबुतरांना खाणं देणं त्वरित बंद करा आणि जनजागृती मोहीम राबवा असे आदेश दिल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलीय.


मुंबईत कबुतरांना खाणं देण्याची प्रथा अनेक दशकांपासून सुरू आहे. माहीम, दादर, मरिन ड्राईव्ह आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांसारख्या ठिकाणी कबुतरखाने आहेत आणि ते प्रसिद्ध आहेत. काही लोक याला धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथेचा भाग मानतात, तर काहींसाठी ही दयेची भावना आहे. मग इतक्या वर्षांनंतर आता का ही बंदी? यामागे आरोग्याच्या चिंतेसोबतच काही राजकीय कारणेही असू शकतात, असा संशय व्यक्त करण्यात येतोय. दक्षिण मुंबईतील गोवालिया टँक येथील 15 वर्षे जुन्या कबुतरखान्याची तोडफोड मुंबई महानगरपालिकेने केली होती. यावर प्राणी कल्याण संघटना आणि पक्षीप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. स्थानिक रहिवासी आणि विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंद दाराआड झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्राणी संघटनांचं म्हणणं होतं. 'कबुतरखाने बंद करण्याऐवजी त्यांचे व्यवस्थापन आणि स्वच्छता सुधारली पाहिजे. जर कबुतरांची अतिवृद्धी समस्या असेल, तर वैज्ञानिक पद्धतीने त्यांची लोकसंख्या नियंत्रित केली पाहिजे. कबुतरखाने बंद केल्याने पर्यावरणीय असंतुलन निर्माण होऊ शकतं', असंही प्राणीप्रेमी संघटनांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे कबुतरखान्यांमुळे रस्त्यांवर अतिक्रमण होतेय आणि अस्वच्छता वाढतेय, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांचा वापर कठीण होतं, असा युक्तिवाद काही स्थानिक रहिवासी आणि राजकीय नेत्यांचा आहे. सरकारच्या आदेशानुसार महानगरपालिकेने तातडीने कारवाई सुरू केलीय. शुक्रवारी सकाळी दादर कबुतरखान्यावर अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली गेली. यात अनधिकृत शेड, धान्याच्या गोण्या आणि तिथली कुंपणं हटवण्यात आली. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कबुतरांना खाणं देण्याच्या धोक्यांबाबत जनजागृती मोहीम सुरू करण्याची तयारी केलीय. येत्या आठवड्यात यासंबंधी मार्गदर्शक तत्वं आणि एसओपी जाहीर केली जाणार आहे.


'गिरगाव चौपाटीवर कबुतरांना पिझ्झा आणि बर्गरसारखे खाद्यपदार्थ दिले जातात, जे त्यांच्यासाठीही हानिकारक आहेत. तर सांताक्रूझ पूर्व आणि दौलतनगर येथील अनधिकृत कबुतर खाने बंद करून तिथे ट्रॅफिक आयलंड आणि मियावाकी उद्याने विकसित केली गेली आहेत', अशी माहिती उदय सामंत यांनी दिलीय. पण प्रश्न असा आहे की, ही बंदी कितपत यशस्वी होईल? काहींच्या मते, धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे लोक कबुतरांना खाणं देणं थांबवणार नाहीत. यापूर्वी दादर कबुतरखाना दोन दिवस बंद केला गेला होता, मात्र लोकांनी पुन्हा खाणं देण्यास सुरुवात केली. मुंबईतील ५१  कबुतरखाने बंद करणं हा निर्णय योग्य की अयोग्य, त्यात राजकीय हेतू आहे की आरोग्याच्या प्रश्न आहे, हे येणारा काळच ठरवेल..

Comments
Add Comment

Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार 'जेन-झीं'शी संवाद

मुंबई : देशातील तरुण पिढी सध्या लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सक्रियपणे

Devendra Fadnavis : नागरिकांच्या सोयीचे मंत्रालयीन विभाग जाणार 'एअर इंडिया' इमारतीत

- मुख्यमंत्र्यांची सूचना; सर्वसामान्यांना अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्या मुंबई : राज्य शासनाच्या विविध

Babulnath Temple : मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी!

मुंबई : पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी (३ ऑगस्ट २०२६) संपूर्ण मुंबई शहर शिवभक्तीत चिंब भिजल्याचे

Biomining Project : राज्यातील १० शहरांमधील कचऱ्याचे डोंगर हटणार; बायोमायनिंग प्रकल्पांसाठी ५२ कोटी

ठाणे, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवडसह १० नागरी संस्थांचा

Mumbai Railway : CSMT स्थानकावर नवी डिजिटल सुविधा; एलईडी स्क्रीनवर मिळणार ट्रेनची रिअल-टाइम माहिती

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने आयपी-आधारित

ST BUS : आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास मुंबई : ‘पंढरीची वारी’ (Pandharpur Wari) ही