पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

  44

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण 


सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रश्नांना मार्ग मिळाला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील संपर्क कार्यालयात थेट जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक रखडलेली प्रकरणे यावेळी निकाली काढण्यात आली, तर काही प्रलंबित विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देण्यात आल्या.


सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात शनिवारी सायंकाळी ३ ते ७ एवढा वेळ जनतेसाठी ठेवला होता. यावेळी जनतेची प्रचंड गर्दी त्यांना भेटण्यासाठी झालेली होती. महावितरण विभागातील कंत्राटी भरती, आरोग्य सेवक, कंत्राटी सफाई कर्मचारी, १०८ टोल फ्री रुग्णवाहिका चालक, निवृत्त शिक्षक, कर्मचारी यांचे प्रश्न घेऊन शिष्टमंडळ भेटले, तर काही खासगी, वैयक्तिक प्रश्न सुद्धा घेऊन नागरिक भेटले. पालकमंत्री नितेश राणे यांनी काही प्रकरणे जागेवरच मार्गी लागली, तर काहींचे तातडीने निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना मोबाइलद्वारे निर्देश देण्यात आले.


यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, तसेच इतर विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संपर्क कार्यालयात नागरिकांनी मांडलेल्या समस्यांमध्ये मच्छीमार, वीज वितरण अडचणी, एसटी बस वाहतूक सेवा, शिक्षक भरतीचे प्रश्न हे ठळक होते.


विशेष बाब म्हणजे, याच वेळी सिंधुदुर्गनगरीला नगरपंचायत घोषित करण्याचा मागणीवरही निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे स्थानिक नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असल्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले. आम्ही जनतेचे सेवक आहोत, प्रशासकीय यंत्रणा ही जनतेसाठी आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल, असा विश्वास पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केले.




  • अनेक रखडलेली प्रकरणे निकाली

  • शिष्टमंडळाच्या समस्या जागेवरच मार्गी

  • समस्या निवारणासाठी अधिकाऱ्यांना निर्देश

  • नागरी सुविधांमध्ये सुधारणांचे संकेत

Comments
Add Comment

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :