'माऊली माऊली'... आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने दिल्या शुभेच्छा

  69

मुंबई: दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे. आज आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पायी पंढरपूरात पोहचले आहेत. संपुर्ण महाराष्ट्राला सावळ्या विठुरायाचे वेड लागले आहे. अनेक कलाकारांनी आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या भावना व्यक्त करीत आहेत.आता अभिनेता रितेश देशमुखनं आषाढी एकादशीनिमित्ताने खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुख याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. रितेशनं त्याच्या लई भारी चित्रपटातील 'माऊली माऊली' गाण्यातील काही ओळी पोस्ट केल्यात. त्यानं लिहलं, "भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची... उभी पंढरी आज नादावली... तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जिवाला तुझी आस गा लागली... जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली... आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!".

आषाढ महिन्यातील पंढरीची वारी ही खूप जुनी परंपरा आहे. आषाढी एकादशीला महाराष्ट्रातील सगळ्या भागांमधून पंढरपूरमध्ये दिंड्या, पालख्या येतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात. त्यामुळे आषाढी एकादशीचे मोठे महत्त्व आहे. वारी म्हणजे विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलावर प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. महाराष्ट्रातलं सामाजिक एकीकरण बांधून ठेवण्यात वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा वाटा आहे. वारकरी संप्रदायाने जातीभेद विसरुन समतेचा पाया रचला आहे. त्यामुळे वारीचा इतिहास महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे यात शंकाच नाही.
Comments
Add Comment

सूर्यावर वादळवारे होतात का?

कथा : प्रा. देवबा पाटील सूर्यावर हायड्रोजन व हेलियममध्ये सतत रासायनिक प्रक्रिया होत असल्यामुळे त्या

रत्नागिरीच्या रस्त्यांवर लवकरच धावणार ई-बसेस, एसटी महामंडळाची ई-क्रांतीकडे वाटचाल

एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून,

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात

रत्नागिरी : दोन अल्पवयीन मुलींचे जंगलात मृतदेह सापडले, चिपळूणमध्ये घटनेनं खळबळ

चिपळूण तालुक्यातील खडपोली गावात दोन आदिवासी अल्पवयीन बहिणींचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने

रत्नागिरीत भरधाव कारने पादचाऱ्याला उडवले, एक गंभीर

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खवटी नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अमेरिकन कंपन्यांवर बहिष्कार?

प्रतिनिधी:अमेरिकेन भारतावर अतिरिक्त टेरिफ कर लावल्यानंतर आता त्याचे पडसाद भारतातील जनसामान्य व विविध