मालवाहतूकदार संघटनांच्या आजच्या बैठकीत ठरणार संपाची दिशा

बचाव कृती समितीमधून संघटनांच्या माघारीस सुरुवात


मुंबई : राज्यातील अवजड वाहने, मालवाहतूकदार संघटनांनी संप सुरू केला असून या संपाला अपेक्षित व्यापकता न आलेली नाही. परिणामी, संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी वाशी येथे ५ जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व मालवाहतूकदार संघटनेच्या प्रमुखांना बोलवण्यात आले आहे.


जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर वाहतूक पोलीस, परिवहन विभागाकडून ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करीत आहेत. हे सर्व दंड माफ करण्यात यावेत, क्लिनरची सक्ती रद्द करावी, शहरातील अवजड वाहनांची येण्या-जाण्याच्या वेळांचा पुनर्विचार करावा, अशी मागणी राज्यातील मालवाहतूकदार संघटनांनी केली असल्याची माहिती वाहतूकदार प्रतिनिधी संजय ढवळे यांनी दिली. आहे. त्यानुसार, राज्यातील सर्व खासगी बस, मालवाहतूकदार आणि राजकीय पक्षांच्या वाहतूक संघटना एकत्र येऊन वाहतूकदार बचाव कृती समिती स्थापन केली होती; परंतु वाहतूकदार बचाव कृती समितीमधील एकेका संघटनेने माघार घेतली.


शालेय बस आणि खासगी बस संघटनांनी संप सुरू करण्याआधीच माघार घेतली. तसेच संप सुरू झाल्यापासून मुंबईतील जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवेचा पुरवठा होत असून, घाऊक बाजारात मालाची व्यवस्थित आवक होत आहे. परिणामी, राज्यस्तरीय चक्का जामबाबत ट्रक, टेम्पो, टँकर, ट्रेलर संघटनांचे प्रमुख व सदस्यांची बैठक नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित करण्यात आली आहे.




न्हावा-शेवा येथील ७० टक्के वाहतूक सेवा शुक्रवारी बंद केली होती. तसेच, अहिल्यानगर, पुणे येथून भाजी, फळे, फुले घेऊन जाणारी वाहने बंद करण्यात येणार आहेत. तसेच वाशी बाजारातील वाहने बंद ठेवण्यासाठी ५ जुलै रोजी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत संपाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
- डॉ. बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघ


Comments
Add Comment

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त