वस्तीगृहातील तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू, पोलिस तपासाला सुरुवात

Nanded: नांदेड येथे एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वस्तीगृहातील तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे त्याचे निधन झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी सकाळी पावने सहाच्या सुमारास आनंदनगर भागातील वानखेडे हॉस्टेलमध्ये ही घटना घडली आहे. वैभव पांचाळ अस मृत विद्यार्थ्यांचं नाव आहे. असे असले तरी, वैभवचा मृत्यू नेमका पडूनच झाला आहे का, की अजून काही गोष्टी यामागे जबाबदार आहेत? याबद्दल पोलिस कसून चौकशी करत आहेत.



आठवड्यापूर्वीच वैभवला वस्तीगृहात दाखल केले होते


आनंदनगर भागात वानखेडे हॉस्टेल आणि कोचिंग क्लासेस आहेत. याच हॉस्टेलचा वैभव हा विद्यार्थी होता. तो सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आठ दिवसापूर्वी कुटुंबियांनी त्याला शिक्षणासाठी आनंदनगर भागातील वानखेडे हॉस्टेल येथे दाखल केले होते. आज सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास तो तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. त्यानंतर तात्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पायऱ्यावरुन पाय घसरुन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं आहे. या प्रकरणी विमानातळ पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अनपेक्षित बातमी समोर आली असून, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत