चोपदाराच्या उद्धटपणामुळे वारीतील स्नेहभाव, प्रेमबंध, सेवाभावाला गालबोट

वारकरी महिलेला जोरात ढकलून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल


सोलापूर : राज्यात सर्वत्र पंढरीच्या वारीचा उत्साह पाहायला मिळत असून लाखो पावले ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगत ही पावले पंढरीच्या दिशेने विठ्ठल भक्तीच्या ओढीने पुढे जात आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताई, संत गजानन महाराज यांच्या पालख्याही भक्तिभावाने मार्गक्रमण करत आहेत. एका रिंगण सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून वारीची शिस्त, वारीतील स्नेहभाव, प्रेमबंध, सेवाभावाला गालबोट लावणारा हा व्हिडीओ आहे.


डोक्यावर तुळस घेऊन चालणाऱ्या एका महिला वारकऱ्यासोबत एका चोपदाराने उद्धट वर्तन केल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. यामध्ये चोपदार एका महिलेला ढकलून देताना आणि पुन्हा वाद करताना दिसत आहे.


संत ज्ञानेश्वरांची पालखी गुरुवारी सकाळी वेळापूरहून प्रस्थान झाल्यावर उघडेवाडी येथे माऊलींचे उभे रिंगण पार पडले. हे रिंगण झाल्यानंतर काही स्त्रिया डोक्यावर तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या. अचानक या दिंडीतले मुख्य चोपदार पुढे आले व तुळस डोक्यावर घेतलेल्या महिला वारकऱ्यास जोरात ढकलून दिले. ती महिला वारकरी गोल रिंगण करून समोर बसलेल्या वारकऱ्याच्या अंगावर पडली. या महिला वारकऱ्याच्या डोक्यावरील तुळस पितळेची होती, दुर्दैवाने ती तुळस इतर कोणाला किंवा त्याच महिलेला लागली असती तर मोठा अनर्थ झाला असता. एवढे होऊनही हे चोपदार महाशय थांबले नाहीत, जोरजोराने ओरडत या महिलेशी ते वाद घालत होते.




  • माऊलींची शिकवण चोपदार विसरले

  • धक्का दिल्यावरही महिलेशी घातला वाद

  • वैष्णवांच्या उत्सवात धक्कादायक घटना


माऊलीच्या पालखीत महिला वारकऱ्यास दु:खद वागणूक


संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणजेच आई म्हणतात आणि याच माऊलीच्या पालखीत एका महिला वारकऱ्यास अशा पद्धतीची वागणूक येणे दुःखद आहे. त्यामुळेच, नेटीझन्सकडून या चोपदाराच्या उद्धटपणावर जोरदार प्रहार केला जात आहे. वारी म्हणजे शिस्त, शांती आणि प्रेमाची शिकवण देणारा वैष्णवांचा उत्सव. मात्र, माऊलींच्या पालखीतील हे चोपदार महाशय ही शिकवण विसरले काय? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे