वारीत अर्बन नक्षलवादी घुसल्याचं मनीषा कायंदेंचं वक्तव्य, रोहित पवारांना झोंबलं

मुंबई: शिवसेना आमदार मनीषा कायंदेंनी आषाढी वारीबद्दल केलेलं वक्तव्य विरोधकांना झोंबलेलं दिसत आहे. वारीत काही संघटनांच्या मार्फत अर्बन नक्षलवादी घुसल्याचे मनीषा कायंदेंच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारनंतर राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली.

आज पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी प्रसारमाध्यमांसमोर रोहित पवार वारकरी वेशात आले, सोबत संविधानाची प्रत त्यांनी घेतली होती, यादरम्यान त्यांनी शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले "गेल्या काही दिवसांपासून काही आमदार राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी तसेच एका वेगळ्या पद्धतीचे वातावरण या महाराष्ट्रात निर्माण व्हावं याचा प्रयत्न करू पाहत आहेत. ज्यामुळे  संविधानाच्या विरोधात असलेला जनसुरक्षा कायदा राज्यात लागू करणे सोपे जाईल, असे त्यांना वाटत आहे. मात्र यासाठी ते वारकऱ्यांना आणि पवित्र वारीला बदनाम करू पाहत आहे." रोहित पवार यांनी असे विधान करताना आमदार मनीषा कायंदे यांचे नाव घेणे जाणीवपूर्वक टाळले.

काय म्हणाले रोहित पवार पहा व्हिडिओ:

 

शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता.  त्यांनी सांगितले की पंढरपूरच्या वारीत देवाला न मानणारे आणि अर्बन नक्षली घटकांनी शिरकाव केला आहे. या घटकांमुळे वारीच्या पवित्रतेला धक्का पोहोचण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

डॉ. कायंदे यांनी विधान परिषदेत भाषण करताना सांगितले की वारी ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि आध्यात्मिकतेचा आधार आहे. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा निर्मळ आणि पवित्र राहिली पाहिजे. परंतु काही घटक या पवित्र परंपरेचा गैरवापर करून आपला राजकीय अजेंडा पुढे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "