आर्थिक वर्ष २६ मध्ये भारताचा वास्तविक जीडीपी विकास दर ६.४-६.७% राहणार!

CII अध्यक्ष राजीव मेमानी यांचे वक्तव्य


प्रतिनिधी: भारतीय अर्थव्यवस्था ६.४% ते ६.७% वाढणार असे वक्तव्य सीआयआयचे (Confederation of Indian Industry CII) अध्यक्ष राजीव मेमानी यांनी केले आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जमलेल्या पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, 'भारतीय अर्थव्यवस्था अनेक कारणांमुळे वाढू शकते. ज्यामध्ये आधारभूत ठरणारा मान्सून, वाढलेली तरलता (Liquidity), आरबीआयने केलेली सीआरआर (Cash Reserve Ratio CRR) मध्ये केलेली कपात यांचा समावेश आहे. सीआरआर मध्ये १०० बीपीएसने केलेल्या कपातीमुळे योग्य कारणासाठी अतिरिक्त २.५ लाख कोटींची बाजारात आवक होणार आहे. बेंचमार्क व्याजदरातही कपात केल्यामुळे (50 BPS) बाजारात याचा फायदा होईल' असे प्रतिपादन त्यांनी बोलताना केले. दिल्लीत सीआयआयचा कार्यक्रमात ते बोलत होते.


सध्या भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. अशा परिस्थितीत भारतीय बाजारापेठेत मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक होत आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मेमानी यांनी जागतिक स्तरावरील राजकीय भौगोलिक स्थितीवर देखील भाष्य केले ते म्हणाले, ' जागतिक आर्थिक आणि राजकीय अस्थिरता गेल्या दोन दशकांमधील सर्वोच्च पातळीवर असताना, वाढत्या प्रमाणात विस्कळीत होत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारत एक उज्ज्वल स्थान म्हणून उभा आहे.' पण ते सुधारणा, नवोपक्रम आणि विश्वास याद्वारे मिळवले पाहिजे. ते पुढे म्हणाले,' भारताचा आत्मविश्वासू, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावर जोडलेली अर्थव्यवस्था म्हणून उदयाला गती देण्यासाठी सरकार, उद्योग आणि नागरिकांसोबत काम करण्यास सीआयआय वचनबद्ध आहे," असे ते म्हणाले. भारताची अंतर्गत गती बाह्य धक्क्यांना तोंड देण्याइतकी मजबूत आहे असे ते म्हणाले.


व्यापार आणि तंत्रज्ञानाचे नियम वेगाने बदलत असताना, आपण भारताच्या वाढीला स्पर्धात्मकतेत, प्रमाण, उत्पादकता, नवोपक्रम आणि लवचिकतेमध्ये बळकटी दिली पाहिजे. हा आपला क्षण आहे. परंतु ते मिळवण्यासाठी आपण निर्णायकपणे कृती केली पाहिजे असेही पुढे म्हटले आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब करून पर्यावरणीय नियम सुव्यवस्थित आणि सुधारित केले पाहिजेत. सर्व राज्य आणि केंद्र पर्यावरणीय मंजुरी एकत्रित करणारी एकीकृत अनुपालन चौकट लागू करण्याची शिफारस सीआयआय करते, असे प्रतिपादन त्यांनी बोलताना केले.


चीन, अमेरिका, ब्रिटन आणि युरो क्षेत्रासारख्या देशांच्या तुलनेत भारताने अधिक आर्थिक लवचिकता कशी दाखवली आहे, विकासाचे दीपस्तंभ कसे राहिले आहे याबद्दलही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai News: सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल; रिलस्टार रणदीप गुजराल अटकेत

मुंबई : मुलुंड (Mulund) परिसरातील एका व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणाऱ्या रणदीप हरबिंदरसिंग गुजराल (वय 40) या

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्की

कोलंबो : भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील रोमहर्षक झुंज केवळ निकालामुळेच नाही, तर मैदानावर झालेल्या

Jalgaon Crime : जीवघेण्या हल्ल्यातील जखमी तरुण रुग्णालयात तर मुख्य आरोपी मोकाट

Jalgaon Crime : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून सर्वच

Pune News: पुणे विमानतळावर १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबलात तर ५०० रुपयांचा दंड; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

पुणे : पुणे विमानतळ (Pune Airport) परिसरातील वाढती वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय

FIFA WORLDCUP 2026 : यासिन अयारीच्या दोन गोलांसह स्वीडनचा ट्युनिशियावर ५-१ ने दणदणीत विजय

मॉन्टेरे, मेक्सिको: २०२६ च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत स्वीडनने आपल्या आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत ट्युनिशियाचा

Pune Crime: गुटख्याच्या पुडीवरून मामाचा संताप; बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार

पुणे: पिंपरी-चिंचवडमधील चिखली (Chikhali) परिसरात नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. गुटखा आणला नाही