आर्थिक वर्ष २६ मध्ये भारताचा वास्तविक जीडीपी विकास दर ६.४-६.७% राहणार!

CII अध्यक्ष राजीव मेमानी यांचे वक्तव्य


प्रतिनिधी: भारतीय अर्थव्यवस्था ६.४% ते ६.७% वाढणार असे वक्तव्य सीआयआयचे (Confederation of Indian Industry CII) अध्यक्ष राजीव मेमानी यांनी केले आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जमलेल्या पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, 'भारतीय अर्थव्यवस्था अनेक कारणांमुळे वाढू शकते. ज्यामध्ये आधारभूत ठरणारा मान्सून, वाढलेली तरलता (Liquidity), आरबीआयने केलेली सीआरआर (Cash Reserve Ratio CRR) मध्ये केलेली कपात यांचा समावेश आहे. सीआरआर मध्ये १०० बीपीएसने केलेल्या कपातीमुळे योग्य कारणासाठी अतिरिक्त २.५ लाख कोटींची बाजारात आवक होणार आहे. बेंचमार्क व्याजदरातही कपात केल्यामुळे (50 BPS) बाजारात याचा फायदा होईल' असे प्रतिपादन त्यांनी बोलताना केले. दिल्लीत सीआयआयचा कार्यक्रमात ते बोलत होते.


सध्या भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. अशा परिस्थितीत भारतीय बाजारापेठेत मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक होत आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मेमानी यांनी जागतिक स्तरावरील राजकीय भौगोलिक स्थितीवर देखील भाष्य केले ते म्हणाले, ' जागतिक आर्थिक आणि राजकीय अस्थिरता गेल्या दोन दशकांमधील सर्वोच्च पातळीवर असताना, वाढत्या प्रमाणात विस्कळीत होत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारत एक उज्ज्वल स्थान म्हणून उभा आहे.' पण ते सुधारणा, नवोपक्रम आणि विश्वास याद्वारे मिळवले पाहिजे. ते पुढे म्हणाले,' भारताचा आत्मविश्वासू, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावर जोडलेली अर्थव्यवस्था म्हणून उदयाला गती देण्यासाठी सरकार, उद्योग आणि नागरिकांसोबत काम करण्यास सीआयआय वचनबद्ध आहे," असे ते म्हणाले. भारताची अंतर्गत गती बाह्य धक्क्यांना तोंड देण्याइतकी मजबूत आहे असे ते म्हणाले.


व्यापार आणि तंत्रज्ञानाचे नियम वेगाने बदलत असताना, आपण भारताच्या वाढीला स्पर्धात्मकतेत, प्रमाण, उत्पादकता, नवोपक्रम आणि लवचिकतेमध्ये बळकटी दिली पाहिजे. हा आपला क्षण आहे. परंतु ते मिळवण्यासाठी आपण निर्णायकपणे कृती केली पाहिजे असेही पुढे म्हटले आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब करून पर्यावरणीय नियम सुव्यवस्थित आणि सुधारित केले पाहिजेत. सर्व राज्य आणि केंद्र पर्यावरणीय मंजुरी एकत्रित करणारी एकीकृत अनुपालन चौकट लागू करण्याची शिफारस सीआयआय करते, असे प्रतिपादन त्यांनी बोलताना केले.


चीन, अमेरिका, ब्रिटन आणि युरो क्षेत्रासारख्या देशांच्या तुलनेत भारताने अधिक आर्थिक लवचिकता कशी दाखवली आहे, विकासाचे दीपस्तंभ कसे राहिले आहे याबद्दलही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

MLC Election : विधानपरिषदेच्या १५ जागांवर भाजप वरचढ

 शिवसेना-राष्ट्रवादीकडे केवळ एकेका जागेवर बहुमत; पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत मोठी चढाओढ मुंबई : विधानपरिषदेच्या

Shiv Thakare :शिव ठाकरेचे मुंबईतील घर पाहिले का? ‘या’ गोष्टींनी वेधले लक्ष

Shiv Thakare Home Tour: फराह खानने बॉलीवूडमध्ये कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ती अनेक

Yash Dayal : हा माझा निर्णय नव्हता; यश दयालच्या वक्तव्यानं खळबळ, RCB व्यवस्थापनावर अप्रत्यक्ष सवाल

IPL 2026 :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) वेगवान गोलंदाज यश दयाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ च्या संपूर्ण

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Divyanka Tripathi Dahiya : लग्नाच्या 10 वर्षांनी प्रेग्नंट दिव्यांका त्रिपाठी, जुळ्या मुलांची झाली आई !

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आणि अभिनेता विवेक दहिया (Vivek Dahiya) यांच्या आयुष्यात नवा