Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी


Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत राहिले. या आंदोलनात देशभरातून अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले होते. याच आंदोलनादरम्यान एक अत्यंत अनोखी आणि चित्रपटाला शोभेल अशी प्रेमकहाणी समोर आली आहे. आंदोलनात सहभागी झालेले दोन तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी मंदिरात लग्न करून नवीन आयुष्याला सुरुवात केली. या जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (NEET Protest)



बिहारचा रहिवासी असलेला मोहन श्रीवास्तव नीट पेपर लीक प्रकरणी विरोध दर्शवण्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर आला होता. आंदोलनादरम्यान तिथे खाण्यापिण्याची सोय नसताना दिल्लीत राहणाऱ्या एका आंदोलक तरुणीने त्याला खाऊ दिले. नंतर तिने त्याला पाणीही आणून दिले. हळूहळू त्यांच्यात संवाद वाढला आणि मैत्री झाली. ती तरुणी स्वतः नीट परीक्षेची विद्यार्थिनी होती आणि न्यायाच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झाली होती. (Viral Video)


याच दरम्यान आंदोलनात झालेल्या लाठीचार्जमध्ये मोहनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो बेशुद्ध पडला. त्या तरुणीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि त्याची काळजी घेतली. मोहन शुद्धीवर आल्यावर तिने त्याला आपल्या भावना सांगत प्रेमाची कबुली दिली. मोहननेदेखील तिचे प्रेम स्वीकारले. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर दोघांनीही वेळ न घालवता मंदिरात जाऊन विवाह केला. (Jantar Mantar)



लग्नानंतर मोहन तिला घेऊन आपल्या गावी बिहारला परतला. आंदोलनासाठी घरातून निघालेला मुलगा थेट घरात नवरी घेऊन आला, हे पाहून त्याचे कुटुंबीय आणि मित्रही अवाक झाले. सध्या या वेगळ्या लव्ह स्टोरीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. (Delhi New)



Comments
Add Comment

Kargil Vijay Diwas : कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत! भारतीय लष्कराच्या 'या' १० मोहिमांनी जगाला दाखवली ताकद

ऑपरेशन विजय (1999) (Operation Vijay) कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय

Constitution Amendment : गेल्या 12 वर्षांत आठ घटना दुरुस्त्या, सरकारची संसदेत माहिती

नवी दिल्ली : गेल्या बारा वर्षांत भारताच्या राज्यघटनेत आठ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय विधी

India Hydrogen Train : भारताच्या हायड्रोजन रेल्वेची यशोगाथा, तीन हजार लिटर डिझेलऐवजी निव्वळ पाण्याची वाफ

नवी दिल्ली : दिल्लीजवळील जिंद आणि सोनीपत या स्थानकांदरम्यान 17 जुलै 2026 रोजी भारताच्या पहिल्या हायड्रोजन

UNESCO World Heritage : सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली : दक्षिण कोरियातील बुसान येथे सुरू असलेल्या 'जागतिक वारसा समिती'च्या 48 व्या बैठकीत, भारताने 2025-26 या

PoK India : पीओके भारताचा अविभाज्य भाग; पाकिस्तानसोबत फक्त याच मुद्यावर चर्चा - राजनाथ सिंह

कारगिल : भारत पाकिस्तानसोबत केवळ पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (पीओके) या मुद्द्यावरच चर्चा करेल असे

Kargil Vijay Diwas : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर योद्ध्यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : कारगिल विजय दिनानिमित्त (Kargil Vijay Diwas) कृतज्ञ राष्ट्र आज वीर जवानांना अभिवादन करत आहे. यावर्षीचा मुख्य