'थोरल्या बाजीरावांनी २० वर्षात ४१ लढाया जिंकल्या'

पुणे : थोरले बाजीराव पेशवे यांनी २० वर्षांत ४१ लढाया लढल्या आणि जिंकल्या. अपराजित राहिलेल्या थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमातून अनेकांना प्रेरणा मिळत राहील. त्यांचा पुतळा होण्यासाठी एनडीए हीच जागा योग्य आहे.



पुणे स्वराज्याचे उगमस्थान आहे. बाजीरावांच्या कार्याने पुढे अनेकांना प्रेरणा मिळत राहणार आहे. याच पुण्यात राहणाऱ्या टिळकांनी पुढे स्वराज्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला.



पुण्यातील खडकवासला येथील एनडीएमधील थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी अमित शाह यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या कार्याची महती सांगितली. 'काही युद्धनीती कालबाह्य होत नाहीत. सध्याची युद्धनीती आणि बाजीरावांची युद्धनीती यामध्ये साम्य आहे. बाजीरावांनी २० वर्षांत ४१ लढाया लढून त्या सर्व जिंकल्या. पराभव निश्चित मानल्या जाणाऱ्या लढाया बाजीरावांनी जिंकल्या. त्यामुळे त्यांच्यासारखा सेनापती दुसरा नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य लढाया लढण्यात गेले. त्यांनी मिळविलेला विजय कल्पने पलिकडचा होता;' असे केंद्रीय गृहंत्री अमित शाह म्हणाले.

मराठा साम्राज्याने प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्याचे कार्य पुढे नेले. शेजारच्या संस्थांनातही प्रशासन उत्तम राबविले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची कल्पना केली, तेव्हा भूगोल वेगळा होता. शिवरायांच्या वारसांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. शिवरायांनंतर संभाजी महाराज, ताराराणी यांनी परंपरा पुढे नेली. बुंदेलखंड, तंजावर, गुजरातपासून अफगाणिस्तान, अटक, कटकपर्यंत स्वराजाचा विस्तार केला. निजामविरोधातील पालखेडचा मराठ्यांचा विजय अविस्मरणीय आहे. जेव्हा नैराश्य येते त्यावेळी छत्रपती शिवराय आणि बाजीरावांचा इतिहास आठवणे हा उत्तम उपाय आहे, असेही केंद्रीय गृहंत्री अमित शाह म्हणाले.

भारतीय नायकांच्या शौर्याचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू

थोरले बाजीराव पेशवे पराक्रम आणि वेगाच्या जोरावर बाजी मारत होते. ज्या काळात प्रवासाच्या सोयी आजच्या तुलनेत कमी होत्या त्या काळात थोरल्या बाजीराव पेशव्यांचे सैन्य दररोज किमान आठ ते दहा किमी. आणि काही वेळा त्यापेक्षा जास्त वेगाने प्रवास करत शत्रूवर हल्ला करायचे. इंग्रजांनी आणि काही स्वकीयांनी आपल्या नायकांवर अन्याय केला. हिंदवी स्वराज्य आणि मराठ्यांचा इतिहास डिलिट करून टाकला. मुघलानंतर इंग्रज आले. त्यामुळे आपल्याला आपल्याच अनेक महानायकांचा विसर पडला. परंतु आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इतिहासातील अनेक नायकांचा, योद्ध्यांचा, स्वातंत्र्यसेनानींचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Comments
Add Comment

Jalna Murder Case : आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी ठरवलेला दिवसच ठरला अंतिम, पोटच्या मुलानेच केली निघृण हत्या

जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या

Pune News : मांजरी स्टेशनचा कायापालट तर रामटेकडीला मिळणार नवे ब्लॉक स्टेशन

पुणे : पुणे रेल्वे विभागाने वाढती प्रवासी गर्दी आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन दोन महत्त्वाचे प्रकल्प

CM Fellowship : तरुणांसाठी मंत्रालयात कामाचा थाट, पगारही जोरात! मुख्यमंत्री फेलोशिपसाठी महिना ६१,५०० रुपयांची संधी; कसा कराल अर्ज ?

मुंबई : राज्यातील कल्पक आणि उत्साही तरुणांसाठी प्रशासकीय सेवेचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी पुन्हा एकदा उपलब्ध

Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र नंबर वन करणार - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : मत्स्यव्यवसायात राज्याला देशात अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य शासनाने अनेक योजना, उपक्रम सुरू केले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime : थरारक! छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा प्रेयसीची गळा चिरून हत्या; पेट्रोल पंपावरील घटनेने जिल्हा हादरला

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील करमाड परिसरात आज दुपारी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना घडली. एका

Minister Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून..... निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३ कोटी ३८ लाखांच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला मंजुरी

निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळणार सुसज्ज विस्तारीत इमारत.... येवला : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व