उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी; शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा जाहीर पाठिंबा

मुंबई: राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने ५ डिसेंबर २०२५ रोजी शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी माहिती दिली. या निर्णयामुळे मुंबईतील शाळा उद्या (५ डिसेंबर, २०२५) बंद असणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्यावतीने मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनात संस्थाचालक संघटना तसेच इतर सर्व संघटना सहभागी होणार आहेत



या निवेदनात नमूद केलेले मुद्दे:


राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये. १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता करण्यात यावे. तसेच टीईटी परीक्षा अनिवार्य करु नये, ही मुख्याध्यापक महामंडळाची मुख्य मागणी आहे. आता राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे. जर टीईटी परीक्षा दिली नाही किंवा परीक्षा पास झाली नाही तर त्या शिक्षकांना काम करता येणार नाही. दरम्यान, आता ही परीक्षा सर्व शिक्षकांना देणे बंधनकारक केले असल्याने हा निर्णय रद्द व्हावा, यासाठीच संपाचा इशारा दिला आहे.





याप्रमाणे १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व विभागातील शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करणे. शिक्षकांना १०-२०-३० वर्षाची आश्वासीत प्रगती योजना लागू करणे. शिक्षणसेवक पद रद्द करून सुरुवातीपासून शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक करणे या सह अन्य मागण्यांचा समावेश असणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.


Comments
Add Comment

Panic in Wardha : वर्ध्यात दहशत! १० गावांत हाय अलर्ट जारी; वनविभाग ॲक्शन मोडमध्ये

वर्धा: महाराष्ट्र आणि देशपातळीवर वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे मानवी वस्त्यांवर आणि शेती परिसरांवर संकट

Nashik-Mumbai Highway : घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर ट्रक दुभाजकाला धडकून उलटला अन्...महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

घोटी : नाशिक–मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी–सिन्नर (Ghoti Sinner) फाटा उड्डाणपुलावर आज एक भीषण अपघात घडला. विटांनी

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी