'मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा, हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या'

मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान


मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा!" अशा बोचऱ्या शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला खुलं आव्हान दिलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यावरून सुरू असलेल्या राजकारणात आता शेलार यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलंय.





"उद्धव ठाकरेंनीच निवडणुका थांबवल्या, आता घाबरत आहेत!"


आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "मुंबई महापालिकेची निवडणूक वेळेवर न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच महापालिकेवर प्रशासक नेमला. नवीन जनगणना नसतानाही त्यांनी २२७ ची वॉर्ड रचना बदलून मनमानी करत २३६ वॉर्डांची रचना केली. यात घोळ घालून निवडणुका लांबवल्या. २३६ वॉर्ड रचनेचा हट्ट धरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि निवडणुका रोखून धरल्या."


शेलार पुढे म्हणाले, "आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगानेही तयारी सुरू केली आहे. तरीही दोन निवडणुका लढल्यानंतर पुन्हा चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. यातून पुन्हा निवडणुका लांबवण्याचाच डाव दिसतोय. निवडणुकीला घाबरणारा हा पक्ष आहे, तथाकथित मर्दांच्या पक्षांचा हा कारभार आहे," असं म्हणत शेलारांनी उबाठाला टोला लगावला.



"मुंबईकरांसाठी भाजपाच लढणारा पक्ष!"


मुंबईकरांसाठी भाजपाच लढणारा पक्ष असल्याचंही शेलार यांनी अधोरेखित केलं. त्यांनी उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान देत म्हटलं, "हिंमत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या!"


सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असली तरी, वॉर्ड रचनेपासून ते चिन्ह आणि पक्ष प्रकरण याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. निवडणूक आयोगाने नोव्हेंबरमध्ये मतदानासाठी तयारी केली असली तरी, न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुन्हा अडथळे येण्याची शक्यता कायम आहे.

Comments
Add Comment

Adani Airport : मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि 'अदानी एअरपोर्ट' प्रशासनाला नोटीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा

High Court : सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना अवमान नोटीस

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत चालढकल; तात्पुरत्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊनही आदेश रखडले मुंबई :

Aarey Colony : आरे वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव अखेर रद्द

राज्य शासनाने जागा घेतली ताब्यात; ३३.६ एकर जमिनीबाबत २० वर्षांपूर्वी झाला होता निर्णय मुंबई : आरे दुग्ध

Sanjay Nirupam : नाशिक TCS प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! मलेशियाचा थेट संबंध असल्याचा दावा

MUMBAI : नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे

Sagar Mitra : किनारपट्टीवरील ९१ अति संवेदनशील लँडिंग पॉईंटवर ‘सागर मित्र’ नेमणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध प्रकल्पांना मिळणार गती मुंबई :

Meghana Sakore-Bordikar : रायगड महावितरणची अपूर्ण कामे मान्सून पूर्वी गतीने पूर्ण करावीत; १०० केव्हीचे २५ ट्रान्सफॉर्मर देण्याचे निर्देश

MUMBAI : रायगड जिल्ह्यातील महावितरणची अपूर्ण असणारी सर्व कामे मान्सून सुरू होण्याअगोदर गतीने पूर्ण करावीत. अलिबाग