जन सुविधा निधीत मोठी वाढ; दिवाबत्तीसह सौरऊर्जा आणि क्रीडांगण विकासासाठी मिळणार विशेष अनुदान
मुंबई(Mumbai) : राज्यातील ग्रामीण भागाचा विकास अधिक गतीने व्हावा आणि ग्रामपंचायतींना स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधा बळकट करता याव्यात, यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेत ग्रामपंचायतींच्या निधीत वाढ केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी मिळणाऱ्या विशेष अनुदान योजनेतील कामांची व्याप्ती व्यापक करीत त्यामध्ये सौरऊर्जा प्रकल्प, क्रीडांगण विकास, वाचनालय यांसारख्या नवीन पाच कामांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
Nashik : इगतपुरी (Igatpuri) येथील निसर्गरम्य भावली धरण (Bhavli Dam) सध्या पोलीस बंदोबस्ताने वेढले गेले आहे. रविवारी (दि. १२) नाशिकरोड (Nashik Road) येथील एका पर्यटक (Tourist) ...
ग्रामीण भागातून सातत्याने होणाऱ्या मागण्या आणि स्थानिक विकासाची वाढती निकड लक्षात घेऊन सरकारने जनसुविधा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या निर्णयानुसार, समाविष्ट करण्यात आलेल्या प्रत्येक नवीन कामासाठी स्वतंत्र खर्चाची मर्यादा आखून देण्यात आली आहे. यामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय कार्यालयांवर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी सर्वाधिक २० लाख रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
कल्याण : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या कल्याणमध्ये (Kalyan) एका धक्कादायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. एका बंद ...
गावांमध्ये सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच गावातील शासकीय इमारतींवर सौरऊर्जा पॅनेल्स बसवण्यासाठी २० लाख रुपये, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी वाचनालय इमारत बांधकामासाठी २० लाख रुपये, आणि ग्रामीण भागातील क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडांगणाचा विकास करण्यासाठी २० लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित केली आहे. याशिवाय गावाच्या हद्दीत असलेल्या शासकीय जागांचे सौंदर्याकरण करण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचा निधी खर्च करता येईल.
राज्यातील ६ मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये ‘धर्मशाळा’ उभारणार मुंबई(Mumbai) : दुर्गम तसेच ग्रामीण भागातून मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांतील शासकीय ...
निधीचा अपव्यय टाळण्यासाठी खबरदारी
दरम्यान, शासकीय निधीचा अपव्यय टळवा आणि या कामांमध्ये पूर्ण पारदर्शकता राहावी, यासाठी सरकारने एक कठोर नियमावली तयार केली आहे. या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे अन्य कोणत्याही शासकीय किंवा स्थानिक योजनेमधून पुन्हा प्रस्तावित करता येणार नाहीत अथवा ती दुबार घेता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारच्या या नवीन निर्णयामुळे राज्यातील ग्रामपंचायतींना आपल्या गावाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, ग्रामीण भागातील सार्वजनिक सोयी-सुविधांचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.