मुंबईत गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन, पाण्यात उभं राहून घोषणाबाजी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी करू नये, ही मागणी घेऊन लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत. लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी आज म्हणजेच गुरुवारी ३ जुलै रोजी गिरगाव चौपाटी येथे पाण्यात उतरुन आंदोलन केले. विधान भवनात पावसाळी अधिवेशन सुरू असल्याचे लक्षात ठेवून हाके आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईत गिरगाव चौपाटी येथे पाण्यात उतरुन आंदोलन केले.

ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके आणि त्यांचे समर्थक थेट समुद्राच्या पाण्यात उतरले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोबत आणलेले बॅनर झळकवले. 'उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो' अशी घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी सरकारमधील ओबीसी नेत्यांचा आणि मंत्र्यांचाही निषेध केला.

राज्य सरकारकडून सारथी आणि बार्टी सारख्या योजनांना जेवढे अनुदान मिळते त्या तुलनेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महाज्योती योजनेला पुरेसे अनुदान मिळत नाही, असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. मागील तीन वर्षांपासून महाज्योती योजनेला सारथी आणि बार्टीच्या तुलनेत कमी महत्त्व दिले जात आहे, असाही आरोप विद्यार्थ्यांनी केला. सरकार दखल घेत नसल्यामुळे समुद्रात उतरुन आंदोलन करण्याची वेळ आली, असेही आंदोलक विद्यार्थी म्हणाले.

 
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई पालिका निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजप १४०, शिवसेना ८७ जागा लढणार?

मुंबई : बहुचर्चित मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार