Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. याविषयी भाजप नेते आणि विद्यमान मंत्री नितेश राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना ‘पिक्चर अभी बाकी हैं, अस म्हणत टोला लगावलाय.



'पिक्चर अजून बाकी आहे'


“कोर्टात चालू असलेला मॅटर आहे. त्याबद्दल किती भाष्य करु शकतो, यावर प्रश्नचिन्ह आहे. हा नितेश राणेंचा विषय नाही. राजकीय आरोपांचा विषय नाही. दिशा सालियानचे वडील ज्यांनी स्वतची मुलगी गमावली ते राजकीय आरोप करणार आहेत का? ते मुद्दामून कोणाचं नाव घेणार का? त्यांनी जे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं, दिशा सालियानच्या वडिलांनी डिनो मारियो, आदित्य ठाकरे यांची नाव घेतली आहेत. म्हणून मी एवढच सांगेन पिक्चर अजून बाकी आहे. पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही. १६ तारीख दिली आहे. त्या तारखेला काय होत ते आपण बघू” असं नितेश राणे म्हणाले.


?si=aB6_PbTXPfXPIQpl

“राज्य सरकार, आत्ताचे पोलीस त्यांना जे नजरेसमोर दिसलं त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला. तुम्हाला आठवत असेल एसआयटी गठीत झाली. त्यात एक अधिकारी होता, तो दिशा सालियान केसमध्ये साथीदार होता. त्याला बदलण्यात यावं, असं पत्र मी दिलेलं. दिशा सालियानच्या वडिलांनी कोर्टात काऊंटर प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. १६ तारखेला काय होतं ते पाहू. पिक्चर अजून बाकी आहे” असं नितेश राणे यांनी म्हंटलंय.



‘आगे, आगे देखो होता हैं क्या’


आदित्य ठाकरे म्हणतात माझा या प्रकरणाशी संबंध नाही. नाहक बदनामी सुरु आहे. त्यावर नितेश राणे म्हणाले की, “यावर आता उत्तर देण्यापेक्षा आगे, आगे देखो होता हैं क्या, तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन ठेवा. नंतर एकत्र वाजवायला मिळतील”



आदित्य ठाकरेंची माहिती खोटी


दरम्यान, कोर्टात आदित्य ठाकरेंनी खोटी माहिती दिली, मी आमदार आहे हे लपवून त्यांनी आपण व्यवसाय करत असल्याचं दाखवलं. दिशा सालियानला नक्की न्याय दिला जाणार हे सर्व आरोपी तुरुंगात जाणार, असेही नितेश राणेंनी म्हटलंय.


Comments
Add Comment

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा

कार्तिकी यात्रेसाठी जादा ११५० एसटी बस सोडणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): बंदा क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक

मुंबईत आता जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात होणार नाही पाणीकपात, महापालिकेने असे घेतले हाती काम...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या काळामध्ये

भारत सागरी सप्ताह २०२५ मध्ये ५५,९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार

भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकारातून समृद्धी आणणार: मंत्री अमित शाह

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण मुंबई : सहकाराच्या माध्यमातून